Pakistani Leaders Threatens India third time in last 48 hours
Pakistan Threatens India : इस्लामाबाद : पाकिस्तान (Pakistan) काय सुधारण्याचे नाव घेईना. भारताने पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalagam Attack) ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) मोहीम राबवत पाकिस्तानला चांगला धडाही शिकवला आहे. भारताने पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी स्थळे उद्ध्वस्त केली आहे. तसेच सिंधु जल कररा स्थगित करुनही चांगली चपराक दिली आहे. मात्र अद्यापही पाकिस्तानने भारताला धमक्या देणे थांबवलेले नाही. गेल्या ४८ तासांता पाकिस्तानने तिसऱ्यांदा भारताला हल्ल्याची धमकी दिली आहे.
पाकिस्तान पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी भारतविरोधी विधान केले आहे. यापूर्वी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर (Aism Munir) आणि माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी भारताला अणु हल्ल्याची धमकी दिली होती.
ट्रम्प यांना मोठा झटका! अलास्कामध्ये बैठकपूर्वी पुतिन यांनी किम जोंग उनशी केली चर्चा
मंगळवारी (१३ ऑगस्ट) इस्लामाबादमध्ये एका कार्यक्रमात शाहबाज यांनी एक विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, शत्रू (भारत) पाकिस्तानकडून एकही थेंब हिरावून घेऊ शकत नाही. तुम्ही पाणी थांबवण्याची धमकी दिली, पण असे केल्यास पाकिस्तान धडा शिकवेल जो तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही.
त्यांनी पुढे म्हटले की, भारताने पाकिस्तानकडे वाहणारे पश्चिमी नद्यांचे पाणी थांबवले तर, हे सिंधू पाणी कराराचे (Indus Water Treaty) मोठे उल्लंघन मानले जाईल. यावर पाकिस्तान देखील योग्य प्रत्युत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही. पाकिस्तान कोणत्याही परिस्थिती आंतरराष्ट्रीय करारांनुसार देशाच्या हक्कांशी कोणतीही तडजोड करणार नाही असे शाहबाज यांनी म्हटले आहे.
#BREAKING: Pakistan Prime Minister Shehbaz Sharif warns India of serious consequences if India stops Indus Water Treaty. Says, he won’t let India take even a drop of Pakistan’s share of water. This is 4th threat from Pak in 48 hours after Asim Munir, Bilawal Bhutto, Khawaja Asif. pic.twitter.com/ER1uojwHoi
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) August 12, 2025
यापूर्वी बिलावल भुट्टो यांनी देखील भारताला युद्धाची धमकी दिली होती. सिंधु पाणी करार स्थगित केल्या युद्धाशिवाय पाकिस्तानकडे कोणताही पर्याया उरणार नाही असे त्यांनी म्हटले होते. तसेच पाकिस्तानचे लष्करप्रमुख यांनी देखील अमेरिकेत असताना भारतासह अर्ध्या जगाला अणु हल्ल्याची धमकी दिली होती. त्यांच्या या धमकीने जगभर खळबळ उडाली. मुनीर यांनी भारताला क्षेपणास्त्र हल्ल्यांचीही धमकी दिली.
⚡ BREAKING: Former Pakistani Foreign Minister Bilawal Bhutto threatens war against India if India continues to put Indus Water Treaty in abeyance & constructs a dam. pic.twitter.com/DW6f3b0AJA
— OSINT Updates (@OsintUpdates) August 11, 2025
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचे कारण काय आहे?
तसे पाहता भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या अनेक काळांपासून तणाव आहे. परंतु २२ एप्रिल रोजी भारताच्या जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर हा तणाव अधिक वाढला आहे.
काय आहे सिंधु जल करार?
भारताने पाकिस्तानसोबत १९६० मध्ये सिंधु जल करारावर स्वाक्षरी केली होती. याअंतर्गत चिनाब, सिंधू आणि झेलम या पश्चिमी नद्यांचे पाणी पाकिस्तान आणि भारतामध्ये वाटले जाईल. तर पूर्वेकडील नद्यांवर केवळ भारताचे नियंत्रण असेल.
एकीकडे अणुहल्ल्याची धमकी तर दुसरीकडे पाण्याची भीक; पाकिस्तानने पसरले भारतापुढे हात