
PM Modi Malaysia Visit
पंतप्रधान मोदी यांनी दहशतवादावर भारत आणि मलेशिया एकत्र लढा देणार असल्याचे म्हटले. त्यांनी सांगितले की, दोन्ही देश सुरक्षा क्षेत्रात, गुप्तचर माहिती शोधण्यात आणि सागरी सुरक्षा मजबूत करण्यावर एकत्रितपणे काम करणार आहे. हा निर्णय दोन्ही देशांत प्रादेशिक शांतता राखण्यासाठी घेण्यात आला आहे. दोन्ही देश संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देणार आहेत.
याशिवाय पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, सध्या बदलत्या जगात तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावत आहे. याचा पार्श्वभूमीवर भारत आणि मलेशियामध्ये सहकार्या वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी सेमीकंडक्टर क्षेत्रातील भागीदारी अधिक बळकट केली जाईल असेही पंतप्रधानांनी म्हटले. तसेच मलेशियामध्ये डिजिटल युपीआय सिस्टीम देखील भारत सुरु करणार आहे.
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सांगितले की, दोन्ही देश अन्न व आरोग्य सुरक्षेवरही सहकार्य वाढवतील. तसेच व्यापाराचे देखील मार्ग भारत मलेशियामध्ये खुले राहणार आहेत. यामुळे दोन्ही देशांतील उद्योजकांना गुंतवणूक आणि आपला व्यापार वाढवण्याची एक उत्तम संधी मिळेल. यामुळे रोजगार उपलब्ध होईल दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला फायदा होईल.
पंतप्रधानांनी आशा व्यक्त केली की भारत मलेशियातील धोरणात्मक भागीदारी ही विश्वासावर आधारित असेल आणि आर्थिक परिवर्तनाकडे घेऊन जाईल. याचा केवळ सरकारलाच नव्हे, तर सामान्यांनाही फायदा होईल असेही त्यांनी म्हटले. पंतप्रधान मोदींनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचा उल्लेख केला. भारत नेहमीच शांततापुर्ण सुरक्षितत आणि समृद्ध भविष्याकडे वाटाचालीसाठी मित्र देशांसोबत कार्य करु इच्छितो असल्याचे स्पष्ट केले. भविष्यात भारत मलेशिया संबंध अधिक मजबूत होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
#WATCH | At joint press statement with Malaysian PM Anwar Ibrahim, PM Narendra Modi says, “In the security sector, we will strengthen cooperation in counter-terrorism, intelligence sharing and maritime security. We will also make defence cooperation more comprehensive. Along with… pic.twitter.com/mxMqZEqRnT — ANI (@ANI) February 8, 2026
Ans: पंतप्रधान मोदींनी भारत आणि मलेशिया दहशतवादावर संयुक्तपणे कठोर कारवाई करतील असे म्हटले.
Ans: दोन्ही देश सुरक्षा क्षेत्रात, गुप्तचर माहिती शोधण्यात आणि सागरी सुरक्षा मजबूत करण्यात आणि दहशतवादविरोधीत लढा देण्यात सहकार्य वाढवणार आहेत.
Ans: भारत मलेशियाने डिजिटल तंत्रज्ञान, व्यापार, अन्न व आरोग्य सुरक्षा यांसारख्या महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये भागीदारी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.