Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India The Mediator: पाकिस्तान केवळ नावापुरता, खरी ताकद मोदींच्याच हाती; प्रसिद्ध लेखक रॉबर्ट कियोसाकी यांचा युद्धावर ‘स्फोटक’ दावा

India The Mediator : इस्रायल आणि अमेरिकेने २८ फेब्रुवारी रोजी इराणवर हल्ले केले. तेव्हापासून पश्चिम आशियामध्ये संघर्ष सुरू आहे. अलीकडेच, पाकिस्तानने या संघर्षात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 29, 2026 | 08:35 AM
robert kiyosaki claim india mediator us iran war pm modi trump strategic play 2026

robert kiyosaki claim india mediator us iran war pm modi trump strategic play 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या लेखकाचा दावा
  • ट्रम्प-मोदी ‘पॉवर’ टॉक
  • भारताचाच सर्वांवर प्रभाव

Robert Kiyosaki on India Iran War mediator : २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर(US-Israel Iran War) केलेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण पश्चिम आशिया पेटला आहे. या युद्धाच्या भीषण वणव्यात आता एका अशा व्यक्तीने एन्ट्री घेतली आहे, जिच्या पुस्तकांनी जगाला आर्थिक धडे दिले. ‘रिच डॅड, पुअर डॅड’ (Rich Dad Poor Dad) या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी इराण-अमेरिका युद्धावर एक अशी फेसबुक पोस्ट लिहिली आहे, ज्याने जागतिक राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. कियोसाकी यांच्या मते, जगाच्या डोळ्यासमोर पाकिस्तान मध्यस्थी करत असल्याचे दिसत असले, तरी पडद्यामागे सूत्रे भारत हलवत आहे.

पाकिस्तान केवळ ‘निरोप्या’, भारत ‘मास्टरमाईंड’

रॉबर्ट कियोसाकी यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे मांडले आहे की, “पाकिस्तान मध्यस्थ असल्याच्या बातम्या केवळ देखावा आहेत. खरी राजनैतिक चर्चा पडद्यामागे सुरू आहे, ज्याबद्दल जगाला सध्या काहीच माहिती नाही.” त्यांच्या मते, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांशी बोलण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी प्रदीर्घ चर्चा केली होती. या चर्चेतच युद्धाच्या समाप्तीची रूपरेषा ठरवण्यात आली आहे. पाकिस्तानचा वापर केवळ एका बाजूचा निरोप दुसऱ्या बाजूला पोहोचवण्यासाठी केला जात आहे, पण मुख्य वाटाघाटी ‘दिल्ली’तून होत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Nepal Ties: ‘तो तर फक्त ट्रेलर होता’ बालेन शाह ‘ॲक्शन मोडमध्ये येताच PM मोदींना पाठवला संदेश; वाचा नेमके काय म्हटले?

भारतावरच सर्वांचा विश्वास का?

कियोसाकी यांनी भारताची तुलना पाकिस्तान, तुर्की किंवा इजिप्तसारख्या देशांशी केली आहे. ते म्हणतात, “भारताची परिस्थिती इतर कोणासारखी नाही. भारत ही एकमेव शक्ती आहे जिची एकाच वेळी अमेरिका, इराण आणि इस्रायल या तिन्ही बाजूंकडे विश्वासार्हता आहे.” इराणचे भारतासोबत ऊर्जेचे घनिष्ठ संबंध आहेत, चाबहार बंदरात मोठी गुंतवणूक आहे. दुसरीकडे, अमेरिकेची भारतासोबत मजबूत सामरिक भागीदारी आहे. भारताचा शब्द इराण टाळू शकत नाही आणि अमेरिकाही भारताच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही.

‘भारताची परिस्थिती पाकिस्तान, तुर्की किंवा इजिप्तपेक्षा वेगळी आहे. सर्व बाजूंनी मजबूत उपस्थिती असलेला भारत हा एकमेव देश आहे. दुसरीकडे, अमेरिकेचा तर सोडाच, इस्रायलचाही पाकिस्तानवर विश्वास नाही. पश्चिम आशियातील सध्याच्या संघर्षात पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका बजावू शकत नाही.’

                                                                                                                                                                                                       रॉबर्ट कियोसाकी

आर्थिक फटका आणि ब्रिक्सचा दबदबा

या युद्धाचा सर्वाधिक फटका भारताला बसत आहे, हे कियोसाकी यांनी अधोरेखित केले. होर्मुझची सामुद्रधुनी विस्कळीत झाल्यामुळे भारताचा तेल पुरवठा धोक्यात आला आहे. तसेच, आखाती देशांमध्ये राहणारे ९० लाख भारतीय देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावतात. २०२६ मध्ये भारत ब्रिक्स (BRICS) चे अध्यक्षपद भूषवणार आहे, जिथे रशिया आणि चीनसारख्या महासत्ता भारतासोबत आहेत. या सर्व कारणांमुळे भारताला हे युद्ध थांबवण्यात सर्वाधिक रस आहे आणि त्या दृष्टीने भारताची पावले पडत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Bangladesh ties: ‘शेवटचा शब्द, आम्ही भारताच्या विरोधात…’ बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी ‘असे’ म्हणून नवी दिल्लीत जिंकली मने

जयशंकर यांची ‘सायलेंट’ मुत्सद्देगिरी

कियोसाकी यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या भूमिकेचेही कौतुक केले. ज्या दिवशी ट्रम्प आणि मोदींचे बोलणे झाले, त्याच दिवशी जयशंकर इराणच्या राजदूतांशी दिल्लीत चर्चा करत होते. ही केवळ योगायोग नाही, तर एका मोठ्या रणनीतीचा भाग आहे. इस्रायल आणि अमेरिकेचा पाकिस्तानवर अजिबात विश्वास नाही, पण भारताच्या शब्दाला जगात मान आहे, हेच कियोसाकी यांनी जगाला पटवून दिले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: रॉबर्ट कियोसाकी यांनी भारताच्या भूमिकेबद्दल काय म्हटले?

    Ans: कियोसाकी यांच्या मते, इराण-अमेरिका युद्धात भारत हाच खरा मध्यस्थ आहे, तर पाकिस्तान केवळ एक निरोप पोहचवणारा दूत आहे.

  • Que: ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या आधी मोदींशी का संवाद साधला?

    Ans: कारण ट्रम्प यांना माहित आहे की मध्य-पूर्वेतील तणाव कमी करण्यासाठी भारताचा प्रभाव आणि विश्वासार्हता इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त आहे.

  • Que: युद्धाचा भारतावर काय परिणाम होत आहे?

    Ans: होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्याने भारताचा कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे आणि आखाती देशांतील ९० लाख भारतीयांच्या रोजगारावर परिणाम होण्याची भीती आहे.

Web Title: Robert kiyosaki claim india mediator us iran war pm modi trump strategic play 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 08:35 AM

Topics:  

  • India news
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

Rules Of War: आधुनिक युगातील युद्धाचे नियम काय आहेत? संयुक्त राष्ट्रांनी त्याचा कसा अर्थ लावला आहे ते जाणून घ्या
1

Rules Of War: आधुनिक युगातील युद्धाचे नियम काय आहेत? संयुक्त राष्ट्रांनी त्याचा कसा अर्थ लावला आहे ते जाणून घ्या

भारतासाठी दिलासा! होर्मुझच्या ‘डेथ झोन’मधून दोन तेलवाहू जहाजांची सुरक्षित सुटका; नौदलाकडून कडेकोट सुरक्षा
2

भारतासाठी दिलासा! होर्मुझच्या ‘डेथ झोन’मधून दोन तेलवाहू जहाजांची सुरक्षित सुटका; नौदलाकडून कडेकोट सुरक्षा

BRICS 2026: ‘आमच्याकडे आलात तर याद राखा!’ इराणचे UAE ला थेट युद्ध-आव्हान; भारत दोन्ही शत्रूंना आणणार एकाच टेबलावर
3

BRICS 2026: ‘आमच्याकडे आलात तर याद राखा!’ इराणचे UAE ला थेट युद्ध-आव्हान; भारत दोन्ही शत्रूंना आणणार एकाच टेबलावर

War Update : येमेनची रणमैदानात उडी! अबु धाबीवर क्षेपणास्त्र हल्ला, 5 भारतीय जखमी; इराणचा थायलंडला ‘स्पेशल’ पास
4

War Update : येमेनची रणमैदानात उडी! अबु धाबीवर क्षेपणास्त्र हल्ला, 5 भारतीय जखमी; इराणचा थायलंडला ‘स्पेशल’ पास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.