Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बलिदान व्यर्थ जाणार नाही’, शाहबाजने पुन्हा भारताविरुद्ध गरळ ओकली; UNGC मध्ये Kashmir मुद्दा उचलून धरणार

Pakistan News: लंडनमध्ये प्रवासी पाकिस्तानी नागरिकांना भेटताना शाहबाज शरीफ म्हणाले की, काश्मीर प्रश्न सोडवल्याशिवाय भारत-पाकिस्तान संबंध सामान्य होऊ शकत नाहीत आणि 'काश्मिरींचे रक्त वाया जाणार नाही'.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 21, 2025 | 04:53 PM
Shahbaz Sharif India-Pakistan ties hinge on Kashmir Kashmiri blood won’t be wasted

Shahbaz Sharif India-Pakistan ties hinge on Kashmir Kashmiri blood won’t be wasted

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पुन्हा भारताविरुद्ध विष ओकले आणि काश्मीर मुद्दा जागतिक स्तरावर उचलण्याचा प्रयत्न सुरू केला.

  • ते २६ सप्टेंबरला संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) भाषण करणार असून त्यात काश्मीर आणि पॅलेस्टाईन प्रश्न मांडण्याची शक्यता आहे.

  • लंडनमध्ये प्रवासी पाकिस्तानी नागरिकांशी बोलताना त्यांनी म्हटले की “काश्मिरींचे रक्त व्यर्थ जाणार नाही” आणि भारत-पाकिस्तान संबंध काश्मीरशिवाय सामान्य होऊ शकत नाहीत.

Shahbaz Sharif Kashmir stance : भारत-पाकिस्तान संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिले आहेत. गेल्या अनेक दशकांपासून पाकिस्तान सतत काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर उचलत आला आहे. आता पुन्हा एकदा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी हाच जुना राग गात भारतावर निशाणा साधला आहे. लंडनमध्ये पाकिस्तानी प्रवासी नागरिकांशी संवाद साधताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा भारतावर कडाडून टीका केली. “काश्मिरींचे रक्त व्यर्थ जाणार नाही”, असे वादग्रस्त विधान करून त्यांनी आगामी संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) भारताविरुद्ध ठाम भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या महासभेतील भाषणाद्वारे शरीफ काश्मीरसह पॅलेस्टाईन प्रश्न उचलून धरणार आहेत.

लंडनमध्ये पाकिस्तानी नागरिकांना उद्देशून भाषण

शाहबाज शरीफ नुकतेच लंडन दौऱ्यावर गेले होते. येथे त्यांनी पाकिस्तानी डायस्पोराच्या (प्रवासी पाकिस्तानी नागरिक) भेटी घेतल्या. या कार्यक्रमात त्यांनी आपल्या नेहमीच्या अजेंड्याची पुनरावृत्ती करत भारतावर टीका केली. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की

“काश्मीर प्रश्न सुटल्याशिवाय भारत आणि पाकिस्तानचे संबंध कधीही सामान्य होऊ शकत नाहीत. काश्मिरींचे रक्त व्यर्थ जाणार नाही.”

त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा भारताविरुद्ध कटुता आणि शत्रुत्व दाखवण्याचा प्रयत्न दिसून आला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘आधी Tariff, आता चाबहार…’; मग का अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Trump पंतप्रधान Modi सोबत करत आहेत मैत्रीचे नाटक?

 चार युद्धांचा उल्लेख

शरीफ यांनी भारत-पाकिस्तानने आतापर्यंत लढलेल्या चार युद्धांची आठवण करून दिली. ते म्हणाले की, या युद्धांसाठी प्रचंड पैसा खर्च झाला. जर हा पैसा लोकांच्या विकासासाठी वापरला गेला असता, तर दोन्ही देशांची प्रगती आज खूप पुढे असती. मात्र त्यांनी याच भाषणात पुन्हा भारतावर दोषारोप करत संवाद फक्त “समानतेच्या आधारावर” होईल असे सांगितले.

 संयुक्त राष्ट्र महासभेत भाषण

२६ सप्टेंबर रोजी शाहबाज शरीफ संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला (UNGA) संबोधित करणार आहेत. पाकिस्तान सध्या महासभेचे अध्यक्षपद भूषवत असल्यामुळे हा मंच त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. परराष्ट्र कार्यालयाच्या निवेदनानुसार, २२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या महासभेच्या ८० व्या सत्रात शरीफ पाकिस्तानच्या प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व करतील. त्यांच्या सोबत उपपंतप्रधान, परराष्ट्र मंत्री आणि इतर वरिष्ठ अधिकारीही असतील.

 काश्मीर आणि पॅलेस्टाईन मुद्दा उचलण्याची तयारी

वृत्तानुसार, शरीफ यांचा हेतू संयुक्त राष्ट्रात भारताला कोंडीत पकडण्याचा आहे. ते काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय समुदायासमोर मांडून भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करणार आहेत. यासोबतच ते पॅलेस्टाईनवरील इस्रायलच्या “बेकायदेशीर कब्जाचा” मुद्दाही उचलण्याची शक्यता आहे. गाझामधील भीषण परिस्थितीकडे लक्ष वेधून पॅलेस्टाईन्यांना मदत करण्याचे आवाहनही ते करणार असल्याचे सूत्र सांगतात.

 भारताविरुद्ध सातत्यपूर्ण अजेंडा

गेल्या अनेक वर्षांत पाकिस्तानने प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र भारताने नेहमीच ठामपणे हा विषय “द्विपक्षीय” असल्याचे सांगितले आणि कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाला नकार दिला. तरीदेखील पाकिस्तान आपली भूमिका बदलण्यास तयार नाही. शाहबाज शरीफ यांच्या या विधानांनी पुन्हा हे स्पष्ट केले आहे की पाकिस्तान अजूनही जुन्या राजकारणाच्या चौकटीत अडकलेला आहे.

 भारताची भूमिका

भारताने नेहमीच सांगितले आहे की जम्मू-काश्मीर हा त्याचा अविभाज्य भाग आहे. पाकिस्तान सतत दहशतवादाला खतपाणी घालून भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, असा ठपका भारताने वारंवार ठेवला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान कितीही उग्र वक्तव्ये करत असले तरी त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर फारसे महत्त्व मिळत नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : UN-Iran deal: ‘इराणची क्षेपणास्त्रे, शस्त्रे अन् पैसा सर्व फ्रीझ होणार’; बहुचर्चित अणुकार्यक्रमावर संयुक्त राष्ट्रांचा मोठा निर्णय

 पाकिस्तानची अंतर्गत परिस्थिती

विशेष म्हणजे, पाकिस्तानची स्वतःची आर्थिक स्थिती अत्यंत ढासळलेली आहे. महागाई, बेरोजगारी, कर्जबाजारीपणा आणि राजकीय अस्थिरता या समस्यांनी देश ग्रासला आहे. अशा वेळी पाकिस्तान सरकारला देशांतर्गत प्रश्नांकडून लक्ष हटवण्यासाठी भारताविरुद्ध वक्तव्य करणे सोयीस्कर ठरते. त्यामुळेच शाहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उचलून लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, असे तज्ज्ञांचे मत आहे.

 लोकांमध्ये निर्माण होणारा प्रश्न

आता प्रश्न असा निर्माण होतो की, पाकिस्तान खरंच भारताशी समानतेच्या पातळीवर संवाद साधण्यास तयार आहे का? की हा फक्त राजकीय डावपेच आहे? गेल्या अनेक दशकांत पाकिस्तानने दहशतवादी गटांना पाठिंबा देऊन भारताविरुद्ध कारवाया घडवल्या आहेत. त्यामुळे संवादावर विश्वास ठेवणे कठीण वाटते. शाहबाज शरीफ यांच्या ताज्या वक्तव्यांमधून पुन्हा एकदा दिसते की पाकिस्तानचा अजेंडा बदललेला नाही. भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये सुधारणा होण्यासाठी दोन्ही देशांनी खऱ्या अर्थाने शांततेचा मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे. मात्र पाकिस्तानचा भारतविरोधी दृष्टिकोन बदलल्याशिवाय तो दिवस दूरच दिसतो.

Web Title: Shahbaz sharif india pakistan ties hinge on kashmir kashmiri blood wont be wasted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2025 | 04:53 PM

Topics:  

  • india pakistan war
  • kashmir
  • pakistan
  • Shahbaz Sharif

संबंधित बातम्या

India-Pak War : जर भारत-पाकिस्तान युद्ध झाले तर Saudi देखील सहभागी होणार का? तज्ञांनी सांगितले करारांमागील सत्य
1

India-Pak War : जर भारत-पाकिस्तान युद्ध झाले तर Saudi देखील सहभागी होणार का? तज्ञांनी सांगितले करारांमागील सत्य

Saudi-Pakistan Pact : इस्लामिक देश सुरक्षा युतीचा पाकिस्तानला पाठिंबा; इस्लामाबादमध्ये सौदी अधिकाऱ्याचे भारताबद्दल ‘असे’ वक्तव्य
2

Saudi-Pakistan Pact : इस्लामिक देश सुरक्षा युतीचा पाकिस्तानला पाठिंबा; इस्लामाबादमध्ये सौदी अधिकाऱ्याचे भारताबद्दल ‘असे’ वक्तव्य

Asia Cup 2025: पाकिस्तानी संघात ‘उलटं-सुलटं’ प्रकरण; फलंदाज ठरला गोलंदाज, तर गोलंदाज ठरला फलंदाज
3

Asia Cup 2025: पाकिस्तानी संघात ‘उलटं-सुलटं’ प्रकरण; फलंदाज ठरला गोलंदाज, तर गोलंदाज ठरला फलंदाज

Asia Cup 2025: आशिया कपमध्ये खेळाऐवजी वादाची चर्चा; पत्रकार परिषदांमध्ये ‘या’ प्रश्नांवर बंदी; ACC चा मोठा निर्णय
4

Asia Cup 2025: आशिया कपमध्ये खेळाऐवजी वादाची चर्चा; पत्रकार परिषदांमध्ये ‘या’ प्रश्नांवर बंदी; ACC चा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.