
taliban attacks noor khan airbase rawalpindi pakistan civil war karachi violence
Taliban attack on Noor Khan Airbase Rawalpindi : शेजारील देश पाकिस्तान सध्या इतिहासातील सर्वात भीषण संकटातून जात आहे. एकीकडे अफगाण तालिबानने पाकिस्तानच्या (Afghanistan-Pakistan Conflict) लष्करी तळांना लक्ष्य करून युद्ध पुकारले आहे, तर दुसरीकडे पाकिस्तान सरकार स्वतःच्याच जनतेचा आवाज दाबण्यासाठी कराचीच्या रस्त्यांवर रक्ताची होळी खेळत आहे. रावळपिंडी येथील अत्यंत महत्त्वाच्या नूर खान हवाई तळावर (Noor Khan Airbase) तालिबानने केलेल्या हवाई हल्ल्याने पाकिस्तानच्या संरक्षण यंत्रणेचे धिंदवडे निघाले आहेत. या हल्ल्यामुळे पाकिस्तान आता चहुबाजूंनी वेढला गेला असून देशाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
अफगाणिस्तानच्या तालिबान राजवटीतील संरक्षण मंत्रालयाने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, त्यांनी रावळपिंडीतील नूर खान हवाई तळावर आणि क्वेट्टामधील १२ व्या कॉर्प्सच्या मुख्यालयावर यशस्वी हवाई हल्ले केले आहेत. तालिबानच्या मते, पाकिस्तानी विमानांनी काबूल आणि बग्राममधील त्यांच्या तळांवर केलेल्या घुसखोरीचा हा सूड आहे. या हल्ल्यात खैबर पख्तूनख्वामधील घेलानी लष्करी तळाचेही मोठे नुकसान झाले आहे. रावळपिंडीसारखा सुरक्षित भागही आता तालिबानच्या टप्प्यात आल्याने पाकिस्तानी लष्कराची झोप उडाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Israel-Iran War: ‘Black Tomahawk’ युद्धातील अदृश्य शिकारी; रडारलाही न सापडणाऱ्या अमेरिकन ब्रह्मास्त्राची ‘अशी’ थरारक कहाणी
देशाच्या सीमा असुरक्षित असताना पाकिस्तानी प्रशासन कराचीमध्ये आपल्याच नागरिकांवर अत्याचार करत आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर कराचीमध्ये सुरू असलेल्या निदर्शकांना चिरडण्यासाठी पोलिसांनी थेट गोळीबार केला आहे. “बाहेरून सहानुभूती दाखवणारे सरकार घरात मात्र हैवान बनले आहे,” अशा शब्दांत आंदोलकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. इराणबद्दल पुतना मावशीचे प्रेम दाखवणाऱ्या शाहबाज शरीफ सरकारचा खरा चेहरा आता जगासमोर आला आहे, जिथे हक्क मागणाऱ्या निष्पाप लोकांच्या छातीवर गोळ्या झाडल्या जात आहेत.
#BREAKING: Taliban in a statement says it has hit Pakistan’s Nur Khan Airbase in Rawalpindi as well as 12th Corps HQs of Pakistan Army in Quetta, Balochistan using armed drone. Af-Pak Border clashes also being reported. This is a developing story. — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) March 2, 2026
credit – social media and Twitter
तालिबानने केवळ नूर खान एअरबेसवरच नाही, तर मोहंमद एजन्सीमधील लष्करी कमांड सेंटर्सवरही अचूक प्रहार केले आहेत. तालिबानने इशारा दिला आहे की, जर त्यांच्या हवाई क्षेत्राचे पुन्हा उल्लंघन झाले, तर इस्लामाबादला यापेक्षाही भयंकर परिणाम भोगावे लागतील. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या हल्ल्यांवर पाकिस्तानी लष्कराने अद्याप मौन बाळगले आहे. लष्करप्रमुख असीम मुनीर आणि पंतप्रधान आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर स्वतःला महान सिद्ध करण्यात व्यस्त असताना, सीमेवर जवान आणि शहरात नागरिक मारले जात आहेत.
#BREAKING: First visuals on @NDTV of Afghan Taliban Armed Drone used to target Pakistan’s Most Sensitive Nur Khan Airbase in Rawalpindi, 10 months after India destroyed the same airbase causing huge embarrassment to Asim Munir. pic.twitter.com/6NF6TnQIp7 — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) March 2, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait of Hormuz: इराणने कापली जगाची ‘लाईफलाईन’! ‘या’ देशांच्या गळ्याभोवती आवळला होर्मुझचा फास; विश्वावर आर्थिक मंदीचं सावट
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील हा वाढता तणाव आता केवळ दोन देशांपुरता मर्यादित राहिलेला नाही. तालिबानने उघडपणे हवाई हल्ले सुरू केल्यामुळे दक्षिण आशियात मोठ्या युद्धाची ठिणगी पडली आहे. चीन आणि रशिया या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. पाकिस्तानमध्ये निर्माण झालेली गृहयुद्धाची परिस्थिती आणि सीमेवरील तालिबानी आक्रमण यामुळे हा अण्वस्त्रधारी देश विखुरण्याच्या मार्गावर आहे का? असा प्रश्न आता जागतिक स्तरावर विचारला जात आहे.
Ans: पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या काबूल आणि बग्राम भागात केलेल्या हवाई हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी तालिबानने हा प्रतिहल्ला केला आहे.
Ans: कराचीमध्ये नागरिक सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरले असून, त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अनेक निष्पाप नागरिक मारले गेले आहेत.
Ans: तालिबानच्या दाव्यानुसार, रावळपिंडीतील नूर खान एअरबेस आणि क्वेट्टातील १२ व्या कॉर्प्सच्या मुख्यालयाचे मोठे नुकसान झाले असून अनेक लष्करी अधिकारी ठार झाले आहेत.