
Turkey President son Bilal Erdogan Bangladesh Visit concerns India
पंतप्रधान बनताच Tarique Rahman ॲक्शन मोडमध्ये; पहिल्या कॅबिनेट बैठकीत धडाकेबाज निर्णयांचा सपाटा
तुर्कीच्या पंतप्रधान एर्दोगान यांच्या मुलाच्या दौऱ्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे दक्षिण आशियातील भू-राजकीय समीकरणात मोठा बदलाचे संकेत मिळत आहेत. बिलाल एर्दोगान यांच्या या दौऱ्यामुळे भारताची चिंता वाढली असून सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बिलाल एर्दोगान बुधवारी (१८ फेब्रुवारी) रोजी बांगलादेशात दाखल झाले होते.
त्याच्यासोबत तुर्कीचे माजी फुटबॉल पट्टू मेसुत ओझिल आणि तुर्कीच्या सरकारी मदत संस्थेचे अध्यक्ष अब्दुला आरोन देखील होते. यावेळी त्यांनी बांगलादेशातील ढाका विद्यापीठात एका वैद्यकीय विभागाचे उद्घाटने केले. यासाठी तुर्कीच्या सरकारी मदत संस्थेने बांगलादेशला निधी दिली होती. याशिवाय बिलाल यांनी बांगलादेशातील कॉक्स बाजार येथील रोहिंग्या निर्वासितांची भेट घेतली होती.
बिलाल एर्दोगान यांची ही भेट तुर्कीसाठी राजकीय दृष्टीकोनातून महत्वाची मानली जात आहे. तुर्कीने ऑगस्ट २०२४ पासून मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांचे अंतरिम सरकार स्थापनव झाल्यापासून बांगलादेशात आपली उपस्थिती वाढवली आहे. विशेष करुन उजव्या विचारसरणीच्या गटांसी त्यांनी संपर्क वाढवला आहे. जमात-ए-इस्लामीशी तुर्कीचा वाढता संबंध भारतासाठी धोक्याचा मानला जात आहे.
तुर्की आणि बांगलादेशातील वाढती जवळीक भारतासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. बांगलादेशातील कट्टपंथी गट जमात-ए-इस्लामीशी जवळीक आणि बिलाल यांच्या दौऱ्यामुळे तुर्कीला राजकीय ताकद मिळण्याची शक्यता आहे. शिवाय दुसरीकडे पाकिस्तान देखील बांगलादेशात आपली उपस्थिती वाढवत आहे. तुर्कीने पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरदरम्यान उघडपणे पाठिंबा दिला होता. यामुळे हे दोन देशा बांगलादेशातील राजकीय वातावरणात भारतविरोधी विष घोळम्याची श्कयात निर्माण झाली आहे.