Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dalai Lama : ओलीस ठेवण्याचा कट, राजवाडा पाडण्याची योजना आणि रक्तपात; दलाई लामांना का सोडावं लागलं होतं तिबेट?

31 मार्च 1959… हा दिवस केवळ तिबेटच्या इतिहासातच नव्हे, तर संपूर्ण आशिया खंडासाठी एक क्रांतिकारक दिवस ठरला होता. याच दिवशी, तिबेटचे बौद्ध धर्माचे सर्वोच्च गुरु आणि आध्यात्मिक नेता, 14वे दलाई लामा चीनच्या हातून निसटले होते

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 06, 2025 | 03:32 PM
ओलीस ठेवण्याचा कट, राजवाडा पाडण्याची योजना आणि रक्तपात; दलाई लामांना का सोडावं लागलं होतं तिबेट?

ओलीस ठेवण्याचा कट, राजवाडा पाडण्याची योजना आणि रक्तपात; दलाई लामांना का सोडावं लागलं होतं तिबेट?

Follow Us
Follow Us:

31 मार्च 1959… हा दिवस केवळ तिबेटच्या इतिहासातच नव्हे, तर संपूर्ण आशिया खंडासाठी एक क्रांतिकारक दिवस ठरला होता. याच दिवशी, तिबेटचे बौद्ध धर्माचे सर्वोच्च गुरु आणि आध्यात्मिक नेता, 14वे दलाई लामा, स्वतःच्या देशातून पलायन करून भारतात आश्रयाला आले होते. त्या दिवशी त्यांनी निर्वासित जीवनाची सुरुवात केली. मात्र त्यावेळी जे घडलं ते रोमांचक आणि बुद्ध धर्मासाठी वेदनादायक होतं.

गाझा युद्धबंदीच्या दिशेने पावले? नेतान्याहू-ट्रम्प भेटीत होऊ शकते मोठी घोषणा, पण अटींत अजूनही मतभेद

तिबेटची राजधानी ल्हासा आणि नोरबुलिंग्का राजवाडा, दलाई लामांचं अधिकृत निवासस्थान.. 1959 च्या मार्च महिन्यात अत्यंत तणावपूर्ण वातावरणात होतं. चीनने 1950 च्या दशकातच तिबेटवर हळूहळू वर्चस्व मिळवायला सुरुवात केली होती. आधी शांततेच्या नावाखाली सैन्य उतरवण्यात आलं, मग तेथील धार्मिक व राजकीय नेतृत्वावर दबाव वाढवण्यात आला. आणि 1959 च्या सुरुवातीला प्रचंड दडपशाहीचं सुरू झाली.

“मी एक धार्मिक परीक्षा देत असताना, माझ्याकडे चीनकडून एक निमंत्रण आलं. त्यांनी मला त्यांच्या सैनिकी तळावर एका कार्यक्रमासाठी येण्यास सांगितलं. पण त्यामध्ये एक अट होती – मी एकटाच यावं, कोणताही अंगरक्षक नको.” ही अट ऐकून तिबेट नेत्यांमध्ये आणि जनतेमध्ये खळबळ उडाली. आधीच पूर्वीच्या प्रांतांमध्ये लामांची हत्या सुरू होती आणि आता दलाई लामांनाच बंदी बनवण्याची शक्यता वाटत होती.

10 मार्चला ल्हासामध्ये तब्बल 30,000 तिबेटी नागरिक नोरबुलिंग्का महालासमोर जमा झाले. “दलाई लामांना महालाबाहेर जाऊ द्यायचं नाही असा त्यांनी निश्चय केला होता. याच दिवशी चीनच्या अधिकाऱ्यांनी “जर आंदोलन संपलं नाही, तर आम्ही सैनिकी कारवाई करू.” करण्याची धमकी दिली.

दलाई लामा द्वीदा मनस्थितीत अडकले होते. एकीकडे त्यांचे रक्षण करणारे लोक, दुसरीकडे त्यांच्या विरोधात मोर्चेबांधणी करणारी चीनी सैन्य. त्यांनी शांततेसाठी वाटाघाटींचा प्रयत्न केला, पण 17 मार्चला नोरबुलिंग्का परिसरात दोन मोर्टार गोळे टाकण्यात आले. ही आक्रमणाची सुरुवात होती. आता वेळ फारच कमी होता.

त्याच रात्री, दलाई लामांनी स्वतः सैनिकाचा पोशाख परिधान केला. त्यांच्या सोबत मंत्री, अंगरक्षक, काही धार्मिक अधिकारी आणि कुटुंबातील सदस्य होते. अंधाऱ्या रात्रीत त्यांनी गुप्तपणे महालातून निघून नदी पार केली आणि हिमालयात लपून भारताच्या दिशेने वाटचाल सुरू केली. जवळ सामान नव्हतं, फक्त थोडे कपडे आणि तिबेट राजसत्तेच्या मोहरा, एक सांस्कृतिक अस्तित्वाचं प्रतीक. माझ्या लोकांना मी त्यांच्या भविष्याचं प्रतीक वाटतो. मी राहिलो असतो, तर माझ्यासोबत अनेक तिबेटींचा मृत्यू झाला असता. म्हणून मी रक्तपात टाळण्यासाठी तिबेट सोडलं , असं दलाई लामा यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे.

चीनने नंतर प्रचार केला की, दलाई लामांना बंडखोर तिबेटींनी बंधक बनवून भारतात पळवून नेलं. पण खुद्द दलाई लामा या आरोपाचा स्पष्ट इन्कार करतात. “हा माझा निर्णय होता. मी कोणत्याही दबावाखाली नव्हतो, पण माझ्या लोकांच्या रक्षणासाठी ही एकमेव पर्याय होता,” असं ते ठामपणे सांगतात.

एलोन मस्कचा प्रयोग की क्रांती? अमेरिकन पार्टी’सह राजकारणात प्रवेश, डेमोक्रॅट आणि रिपब्लिकनशी तगडी स्पर्धा

1959 मध्ये जे काही घडलं, ते एका धर्मगुरूने आपल्या लोकांसाठी घेतलेलं जिवावर बेतणाऱ्या निर्णयाचं अत्यंत हृदयद्रावक आणि प्रेरणादायक उदाहरण आहे. आजही, भारतात निर्वासित म्हणून राहत असलेले दलाई लामा जगभर शांततेचे दूत म्हणून ओळखले जातात. पण त्यांचा हा संघर्ष, त्याग आणि तिबेटच्या अस्मितेचं रक्षण करण्याची त्यांची आंतरिक लढाई 20व्या शतकातील एक महत्त्वाची घटना बनली आहे.

Web Title: Why dalai lama leave tibet in 1959 great escape from china latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2025 | 03:32 PM

Topics:  

  • China
  • Dalai Lama
  • India-China Disputes

संबंधित बातम्या

China Tech: चिनी स्मार्टवॉच आता शत्रूच्या पाणबुड्या शोधणार; धुळीच्या कणाएवढ्या चिपमुळे हिंद महासागरात भारतीय नौदलाची वाढली चिंता
1

China Tech: चिनी स्मार्टवॉच आता शत्रूच्या पाणबुड्या शोधणार; धुळीच्या कणाएवढ्या चिपमुळे हिंद महासागरात भारतीय नौदलाची वाढली चिंता

Shanghai Ranking 2026 : अमेरिकन विद्यापीठांचे वर्चस्व कायम; पहिल्या 100 मध्ये फ्रान्सच्या चार विद्यापीठांचा समावेश
2

Shanghai Ranking 2026 : अमेरिकन विद्यापीठांचे वर्चस्व कायम; पहिल्या 100 मध्ये फ्रान्सच्या चार विद्यापीठांचा समावेश

Balochistan News : बलुच नेत्याची मुनीर-शहबाज यांच्यावर जोरदार टीका; ट्रम्प-जिनपिंग यांना खुले पत्र, पाकिस्तानच्या भूमिकेवर सवाल
3

Balochistan News : बलुच नेत्याची मुनीर-शहबाज यांच्यावर जोरदार टीका; ट्रम्प-जिनपिंग यांना खुले पत्र, पाकिस्तानच्या भूमिकेवर सवाल

China News : इराण-युक्रेनमध्ये जग अडकले; चीनने साधली संधी, आशिया-पॅसिफिकमध्ये वाढवल्या लष्करी हालचाली!
4

China News : इराण-युक्रेनमध्ये जग अडकले; चीनने साधली संधी, आशिया-पॅसिफिकमध्ये वाढवल्या लष्करी हालचाली!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.