
महागाईच्या काळात ग्राहकांना मोठा दिलासा; 'या' शहरात पेट्रोल अवघ्या ८८.६६ रुपये प्रतिलिटर, जाणून घ्या सविस्तर
जगभरात सगळीकडेच कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मागील काही दिवसांपासून झपाट्याने वाढ होत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील वादामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. भारतासह इतर सर्वच देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यामुळे महागाईच्या झळा सगळ्यांचं सोसाव्या लागत आहेत. भारत आपल्या इंधनाच्या गरजेपैकी ८५ टक्क्यांहून अधिक इंधन आयात करतो. पण होर्मुझच्या सामुद्रधुनीतील नाकेबंदीमुळे देशातील तेल कंपन्यांच्या नफ्यावर लक्षणीय परिणाम झाला आहे. इंधनाच्या दारात वाढ झाल्यामुळे घरगुती गॅस, व्यावसायिक गॅसच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. भारतात सध्या पेट्रोलचे दर प्रति लिटर १०० रुपयांपेक्षा अधिक आहेत. तर डिझेलचे दर प्रति लिटर ९५ रुपयांपेक्षा जास्त आहेत. पण तुम्हाला माहित आहे का भारतातील अशा एका शहरात पेट्रोल डिझेलचे दर १०० रुपयांपेक्षा सुद्धा कमी आहेत. तिथे पेट्रोलची किंमत प्रति लिटर 88.66 रुपये आहे. चला तर जाणून घेऊया भारतातील या शहरात का कमी आहेत पेट्रोलचे दर.(फोटो सौजन्य – istock)
हे 10 ऑटोमोबाईल कोर्सेस ठरू शकतात तुमच्या यशस्वी करिअरची चावी; जाणून घ्या पात्रता, संधी आणि स्कोप
आपल्यातील अनेकांना कायमच वाटते की, भारतातील मोठ्या महानगरांमध्ये पेट्रोल सर्वात स्वस्त असते, पण असे नाही. राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर १०२.१२ रुपये प्रति लिटर आहे, तर आर्थिक राजधानी मुंबईमध्ये तो १११.२१ रुपये प्रति लिटर आणि बंगळूरुमध्ये ११०.९३ रुपये प्रति लिटर आहे.तर सगळ्यात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये आहे. हे शहर राष्ट्रीय राजधानीपासून २,४८५ किमी अंतरावर, अंदमान आणि निकोबार बेटांवर वसलेले आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये भारतातील सगळ्यात जास्त स्वस्त पेट्रोल मिळते. प्रत्येक राज्यात आणि शहरात पेट्रोलची किंमत १०० रुपयांपेक्षा जास्त असताना, पोर्ट ब्लेअरमध्ये त्याची किंमत प्रति लिटर ८८.६६ रुपये आहे. पेट्रोलच्या किमती ऐकून सगळ्यांचं आश्चर्याचा धक्का बसेल.
भारतातील पेट्रोलचे दर सार्वजनिक क्षेत्रातील तेल उत्पादक कंपन्यांद्वारे ठरवले जातात. यामध्ये राज्य सरकारांनी आकारलेल्या व्हॅटसह विविध घटकांचा समावेश असतो.भारतातील बहुतेक शहरांमध्ये पेट्रोलवर सुमारे ३०-४० टक्के व्हॅट आकारला जातो, तर अंदमान आणि निकोबार बेटांवर केवळ सुमारे ६ टक्के व्हॅट आकारला जातो. त्यामुळे पोर्ट ब्लेअरमध्ये भारताच्या तुलनेत सगळ्यात स्वस्त पेट्रोल आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवरील रहिवाशांना अनुदानित इंधन पुरवले जाते कारण त्यांना भौगोलिक आणि लॉजिस्टिक आव्हानांचा सामना करावा लागतो.
‘मेक इन इंडिया’ मुळे मागच्या दशकभारत ऑटोमोबाईल उद्योगाला नेमका काय फायदा झाला? सविस्तरपणे जाणून घ्या
अमेरिका आणि इराण युद्धाचा परिणाम भारतासह जगभरातील सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होण्यासोबतच सोन्या चांदीचे दर सुद्धा वाढले आहे. महागाई वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. येणाऱ्या आगामी काळात अमेरिका इराण युद्ध असेच चालू राहिल्यास कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ होण्यासोबतच इतर सर्वच गोष्टींमध्ये महागाई वाढण्याची शक्यता असते. इंधन पुरवठा कमी झाल्यामुळे महागाईसोबतच तणाव वाढू शकतो.