
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने ऑटोमोबाईल क्षेत्रात एक नवा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. महिंद्राच्या चाकण येथील मुख्य कारखान्यातून ३० लाखावे वाहन यशस्वीरीत्या उत्पादन होऊन बाहेर पडले आहे. डिसेंबर २००९ मध्ये सुरू झालेल्या या प्लांटसाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे, म्हणायला हवं. विशेष म्हणजे, ही ३० लाखवी ऐतिहासिक गाडी महिंद्राची येणारी इलेक्ट्रिक कार ‘Mahindra BE 6’ ठरली आहे. हे पाऊल महिंद्राच्या ‘बॉर्न-इलेक्ट्रिक’ पोर्टफोलिओचे वाढते महत्त्व अजून अधोरेखित करते.
अवघ्या २७ महिन्यांत १० लाख गाड्यांची निर्मिती
या कामगिरीतील सर्वात कौतुकास्पद गोष्ट म्हणजे महिंद्राचा वाढलेला उत्पादनाचा वेग. पहिल्या १० लाख गाड्या तयार करण्यासाठी कंपनीला १०७ महिने लागले होते. मात्र, तंत्रज्ञानाचा वापर आणि वाढत्या मागणीमुळे शेवटच्या १० लाख वाहनांचे उत्पादन अवघ्या २७ महिन्यांत पूर्ण करण्यात आले.
६५७ एकरांवर पसरलेला हा चाकण प्लांट आता महिंद्राचा पॅसेंजर गाड्या, इलेक्ट्रिक वाहने आणि व्यावसायिक वाहनांचा मुख्य हब बनला आहे. सध्या या एकाच ठिकाणी १९ मॉडेलच्या तब्बल ४५० हून अधिक व्हेरिएंट्सचे उत्पादन केले जाते. स्कॉर्पिओ एन, थार, XUV 3XO, XUV700 आणि नवीन BE 6 व XEV 9e यांसारख्या लोकप्रिय गाड्यांच्या यशामुळे उत्पादनाचा वेग प्रचंड वाढला आहे. जून २०२६ मध्ये महिंद्राच्या एसयूव्ही विक्रीत ३७% वाढ झाली असून ती ६०,००० युनिट्सच्या पार गेली आहे.
‘इंडस्ट्री ४.०‘ आणि हायटेक रोबोट्सचा वापर
महिंद्राने चाकण प्लांटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश केला गेलेला आहे. सध्या या कारखान्यात,
पर्यावरणपूरक आणि ‘वॉटर पॉझिटिव्ह‘ कारखाना
महिंद्राचा चाकण प्लांट पर्यावरणाचीही तेवढीच काळजी घेतो. या प्लांटला लागणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी ५०% पेक्षा जास्त ऊर्जा ही नवीकरणीय ऊर्जेपासून मिळते. विशेष म्हणजे, इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन तर १००% या ऊर्जेवर चालते. हा कारखाना ‘झिरो वेस्ट टू लँडफिल’ (कचरामुक्त) प्रमाणित आहे. तसेच, हा प्लांट १३१% वॉटर पॉझिटिव्ह आहे, म्हणजेच जेवढे पाणी वापरले जाते, त्यापेक्षा जास्त पाणी निसर्गाला परत केले जाते.
जागतिक बाजारपेठेत मोठा दबदबा
चाकण प्लांट केवळ भारताचीच नाही तर जगाची गरज भागवत आहे. इथे तयार होणारी वाहने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांसारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात केली जातात. आगामी काळातही महिंद्राच्या जागतिक विस्तार आणि भविष्यातील गाड्यांच्या धोरणात चाकण प्लांट अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.