
EV गाड्यांना सगळ्यात जास्त मागणी का ?
EV गाड्यांचा सर्वात मोठा फायदा हा आहे की त्यातून कोणताही धूर निघत नाही, ज्यामुळे हवा स्वच्छ राहण्यास मदत होते. शहरांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी हा एक चांगला पर्याय मानला जातो.याव्यतिरिक्त, ईव्ही चालवायला स्वस्त आहेत. त्यांना पेट्रोल किंवा डिझेलची आवश्यकता नसते आणि चार्जिंगचा खर्चही कमी असतो. इंजिनचे भाग कमी असल्यामुळे देखभाल देखील कमी करावी लागते. यामुळेच लोक हळूहळू EV स्वीकारत आहेत आणि कंपन्या नवीन मॉडेल्स बाजारात आणत आहेत.
ईव्हीच्या बाबतीत सर्वात मोठी चिंता त्यांच्या बॅटरीची आहे. बॅटरी खूप महाग असतात आणि त्या निकामी झाल्यास, बदली करायला खूप खर्च येतो. बॅटरीची सुरक्षितता हा देखील एक मोठा मुद्दा आहे.अलीकडे EV कार किंवा स्कूटरला आग लागण्याच्या काही घटना घडल्या आहेत.
चार्जिंग आणि पायाभूत सुविधांच्या समस्या
इलेक्ट्रिक वाहन (EV) खरेदी केल्यानंतर सर्वात मोठे आव्हान चार्जिंगचे असते. चार्जिंग स्टेशन्स सर्वत्र उपलब्ध नाहीत.तुम्ही लांबच्या प्रवासाला जात असाल तर, चार्जिंग ही एक सततची चिंता असते. चार्जिंगला अनेकदा बराच वेळ लागू शकतो, जी अनेकांसाठी एक समस्या ठरू शकते. यामुळेच बरीच लोक आजही पेट्रोल किंवा डिझेल गाड्यांना जास्त प्रधान्य देतात.