
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
NDTV प्रॉफिटने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, ATM मधील रोख रकमेच्या तुटवड्यामुळे RBI ने सर्व बँकांना टियर-२ आणि लहान शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या रोख रकमेचा संपूर्ण तपशील मागवला आहे. यामुळे विविध ठिकाणी रोख रकमेच्या तुटवड्यामागील कारणे निश्चित करण्यास मदत होईल. याव्यतिरिक्त, काही बँकांनी शहरांमध्ये आणि लहान गावांमध्ये गरजेपेक्षा जास्त रोख रक्कम खर्च केली आहे का, किंवा ATM वेळेवर रीलोड न केल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे का, याचीही RBI चौकशी करत आहे. RBI ने स्पष्ट केले आहे की, असे काही आढळून आल्यास कारवाई केली जाईल.
या मुद्द्यावर, बँकांचं म्हणणे आहे की केवळ एकूण रोख रकमेचा साठा पाहून परिस्थितीचा अंदाज लावता येत नाही. बँकांच्या मते, खराब झालेल्या किंवा फाटलेल्या नोटा ATM मध्ये टाकता येत नाहीत.
ATM मधून रोख रक्कम काढण्याच्या समस्येमुळे ग्रामीण आणि निमशहरी भागातील लोकांना सर्वाधिक फटका बसला आहे. अहवालानुसार, या राज्यांना सर्वाधिक फटका बसला:
आंध्र प्रदेश
तेलंगणा
कर्नाटक
या राज्यांमध्ये ATM मधील रोख रकमेच्या तुटवड्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. या राज्यातून तक्रारी आल्याने RBI अलर्ट मोडवर आली आहे. बँकेकडून डेटा मागून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाईचा थेट इशाराही देण्यात आला आहे.