• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Blogs »
  • Incidents Disguise External Power Centers Nrvb

राजरंग : घटनाबाह्य सत्ताकेंद्रांना वेसण घाला

नव्या सरकारचे पहिले पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला भाजपच्या एकाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याला कारागृहात टाकण्याबाबत ट्विट केले. राजकीय चर्चा सुरु झाली, थोडीफार खळबळ उडली, पण एका राजकीय पक्षाचा नेता असा दावा कोणत्या अधिकारात करू शकतो? तपास यंत्रणांचा राजकीय संबंध नाकारणारे मग असे हेतुपुरस्सर विधाने करणाऱ्यांना रोखत का नाहीत? अशी कोणती शक्ती व्यवस्थेबाहेरच्या या लोकांकडे असते, ज्यानुसार अख्खी यंत्रणा यांची बटीक झाल्यासारखी वागते? अशा अनेक प्रश्नांची गेल्या काही दिवसात उत्तरे मिळालेली नाहीत. ही घटनाबाह्य सत्ताकेंद्र आहेत की नेत्यांच्या मनातील बोलणारे पोपट आहेत, हेसुद्धा समोर येण्याची गरज आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Aug 21, 2022 | 06:00 AM
राजरंग : घटनाबाह्य सत्ताकेंद्रांना वेसण घाला
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा नेता आता कारागृहात असलेल्या अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्या भेटीला जाणार आहे. परमबीर सिंग यांनी बंद केलेल्या सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी होणार. त्या नेत्याच्या गर्लफ्रेंडच्या नावावर असलेली मालमत्ताही जाहीर करणार. ईडी या बड्या नेत्याला अटक करणार, असे खळबळजनक ट्विट भाजपमध्ये सध्या चलती असलेल्या मोहित कंबोज भारतीय यांनी केले.

विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केलेल्या या ट्विटचा इप्सित परिणाम पहिल्याच दिवसापासून दिसून आला. आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत असलेली राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफुटवर आलेली दिसली. विरोधी पक्षनेता म्हणून फडणवीसांप्रमाणेच आपली प्रतिमा तयार करण्याचे मनोमन ठरवलेल्या अजित पवार यांना अधिवेशनाच्या काळात कदाचित औपचारिक सौम्य विरोध करण्याची भूमिका घ्यावी लागेल. त्यांना फार आक्रमक होता येणार नाही.

सरकारचे वाभाडे काढता येणार नाहीत कारण त्यांचे हात दगडाखाली अडकले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांना नामोहरम करण्यासाठी अशा अनेक क्लृप्त्या वापरल्या जातात, जात असत. आक्रमक होणाऱ्या विरोधकांवर दबाव आणण्याचे अस्त्र सरकारकडून वापरले जाते. राजकारणाचा खेळ सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर रस्त्यावरही खेळला, खेळवला जातो. त्यातलाच हा प्रकार आहे. पण मोहित यांचा दावा हा केवळ राजकीय दबावतंत्राचा वापर म्हणून पाहणे शक्य नाही. हा केवळ आरोपही नाही.

कार्पोरेट कंपन्यांच्या माध्यमातून निवडणुकीचे नियोजन ठरवण्याचे दिवस सध्या आले आहेत. लोकांचे लोकांसाठीचे राज्य वगैरे सगळे गुंडाळून ठेवत प्रशांत किशोरसारखी मंडळी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या लोकांचे लोंढ्यात आणि लोंढ्यांचे मतदानात परिवर्तन करण्यात यशस्वी होत आहेत. कोणता भौगोलिक परिसर कोणत्या मतदारसंघाला जोडला तर कोण निवडून येईल, याचे नियोजन वातानुकूलित कार्यालयात बसून आणि प्रोजेक्टरच्या पडद्यावर होऊ शकते.

याचा अनुभव अगदी महापालिकेच्या वॉर्ड रचनेपर्यंत घेता येतो. तंत्रज्ञानाच्या जंजाळात अडकलेल्या जनतेला झुंडीतही रुपांतरित करता येते आणि या झुंडी सोयीस्कररित्या पेटवल्या जाऊ शकतात. अशा वातावरणात केवळ कंबोजच नव्हे तर त्यांच्यापूर्वी किरीट सोमय्या किंवा संजय राऊत असे लोक करत असलेल्या दाव्यांकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे.

या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी केलेला विरोधी पक्षाच्या नेत्याचा भांडाफोड, असे म्हणून त्याकडे पाहता येणार नाही. अथवा दुर्लक्षही करता येणार नाही. नेत्यांच्या आजूबाजूच्या लोकांची, त्यांच्या निकटवर्तीयांची अनेक वर्तुळं आहेत. या वर्तुळात वावरणारे हे सत्ताकेंद्र आहेत. घटनाबाह्य सत्ताकेंद्र.

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून खुर्चीवर बसवून त्यांच्या मार्गदर्शकाची, पाठीराख्याची भूमिका बजावण्याचे जाहीर करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद घेण्यास भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी भाग पाडले. कोणत्याही सरकारवर नियंत्रण ठेवायचे असेल, सुधारणा करायची असेल, मार्गदर्शन करायचे असेल तर त्या व्यवस्थेचा भाग असणे कायदेशीरच नव्हे तर नैतिकदृष्ट्याही क्रमप्राप्त आहे.

हेच फडणवीस यांना दुय्यम असले तरीही उपमुख्यमंत्रीपद घ्यावे लागण्यामागचे कारण आहे. घटनाबाह्य सत्ताकेंद्र उभे राहू नये, हासुद्धा एक विचार त्यामागे असावा. मात्र, गेल्या काही वर्षात सत्ताकेंद्रांच्या परिघात राहून तेथून ऊर्जा घेत अनेक परप्रकाशित सत्ताकेंद्र उभे राहत आहेत. ‘त्यांचा अविनाश भोसले तर आमचा अजून कोणीतरी’ असे म्हणून या प्रकाराचे समर्थन करणे शक्य नाही.

सत्तेच्या जवळचा एक पदाधिकारी जो कोणत्याही घटनात्मक पदावर नाही, तो उठतो आणि एखाद्या लोकप्रतिनिधीवर आरोप करतो. त्या लोकप्रतिनिधीविरुद्ध कोणत्या सरकारी यंत्रणेने कारवाई करावी, याची सूचना करतो. किंवा काय कारवाई कोणती यंत्रणा करणार आहे, हे अगदी शपथेवर सांगतो. पुढच्या काही दिवसातच अगदी त्या पदाधिकाऱ्याने सांगीतल्या बरहुकूम कारवाई होते. कारवाईसाठी मुदत दिली जाते, अल्टीमेटम दिला जातो, अखेरचा दिवस मुक्रर असल्याचेही जाहीर केले जाते.

हा प्रकार एकीकडे खुनशी, वैयक्तिक सूडाच्या राजकारणाला कारणीभूत ठरतो तर दुसरीकडे तो शासकीय यंत्रणांच्या विश्र्वासार्हतेचे चीरहरण करणाराही ठरतो. व्यवस्थेच्या बाहेरच्या कोण्यातरी व्यक्तीच्या प्रभावात यंत्रणा काम करतात, असा संदेश समाजात जाणे, कायद्याचा आदर धुळीस मिळविण्यास आणि पर्यायाने अराजकाला खतपाणी घालण्याचे कारण ठरतो.

मात्र आम्ही सांगू तशाच प्रकारे सरकारी यंत्रणा वागणार कारण आम्ही सरकारच्या जवळच्या परिघात आहोत, याची अधिकाधिक प्रसिद्धी मिळवत आपले महत्व आणि ‘गरजुंपर्यंत’ आपली उपयोगिता पोहचवण्यासाठी अशा घटनाबाह्य सत्ताकेंद्रांना ही मोठी संधी असते. ती संधी वारंवार राज्यात साधली जात आहे, हा प्रकार शोचनीय आहे.

सरकारी यंत्रणांनी सर्वसामान्यांच्या एखाद्या तक्रारीवरुनही कारवाई करावी. भूखंड माफिया असोत की खादाड राजकीय नेते, सगळ्यांना समान न्याय लावत ईडी, सीबीआय, प्राप्तीकर विभागाने कारवाई करावी. पण कोणीतरी सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून सांगतोय आणि यंत्रणा जशीच्या तशी कारवाई करताहेत, ही गंभीर बाब आहे. हा सगळ्या प्रकार चार भिंतींआड न होता जाहीररित्या, माध्यमांसमोर होतो, याचाही एक वेगळाच परिणाम यंत्रणांच्या विश्र्वासार्हतेवर होतो.

आजच्या तात्कालिक राजकीय स्वार्थापोटी शासन व्यवस्थेचा अविभाज्य घटक असलेल्या संस्थांची जनतेतील पत जाणे धोकादायक आहे, हे लक्षात घ्यायला हवे. त्यासाठी घटनाबाह्य सत्ताकेंद्रांना ऊर्जा देणाऱ्या नेतृत्वानेच त्यांना वेसण घालण्याची गरज आहे. मूळात ही अशी घटनाबाह्य सत्ताकेंद्र आहेत, हे मान्य करायला हवे. अन्यथा नोकरशहा आणि आणि सत्ताकेंद्र हातात हात घालून वाटचाल करत राहतील. या स्थितीत विरोधक कदाचित उद्ध्वस्त होतीलही पण यंत्रणांवरही राजकीय पक्षांचा शिक्का लागलेला असेल.

विशाल राजे

vishalvkings@gmail.com

Web Title: Incidents disguise external power centers nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2022 | 06:00 AM

Topics:  

  • anil deshmukh
  • elections
  • nawab malik

संबंधित बातम्या

Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल
1

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Travel News : थेट फ्लाइट्स, सुलभ व्हिसा आणि इंडियन फील; मित्रराष्ट्रातील ‘हे’ शहर बनले आहे भारतीय पर्यटकांसाठी ‘हॉट डेस्टिनेशन’

Travel News : थेट फ्लाइट्स, सुलभ व्हिसा आणि इंडियन फील; मित्रराष्ट्रातील ‘हे’ शहर बनले आहे भारतीय पर्यटकांसाठी ‘हॉट डेस्टिनेशन’

Nov 16, 2025 | 09:45 PM
‘या’ 5 गोष्टी बनवतं Maruti Wagon R ला मध्यम वर्गीय कुटुंबाची आवडती कार

‘या’ 5 गोष्टी बनवतं Maruti Wagon R ला मध्यम वर्गीय कुटुंबाची आवडती कार

Nov 16, 2025 | 09:41 PM
“मी गे आहे, हे जेव्हा आई वडिलांना समजलं तेव्हा…”, Mr. Gay World India निखिल जैनची ‘नवराष्ट्र’ सोबत खास मुलाखत

“मी गे आहे, हे जेव्हा आई वडिलांना समजलं तेव्हा…”, Mr. Gay World India निखिल जैनची ‘नवराष्ट्र’ सोबत खास मुलाखत

Nov 16, 2025 | 09:14 PM
कोरियन सिंगर ह्युना अचानक कोसळली स्टेजवर! वेट लॉस पडला भारी

कोरियन सिंगर ह्युना अचानक कोसळली स्टेजवर! वेट लॉस पडला भारी

Nov 16, 2025 | 09:03 PM
पृथ्वीचा सर्वात खालचा बिंदू आणि त्यातील जीवंत चमत्कार; वाचा का आहे जगाला ‘या’ महासागराचे इतके आकर्षण?

पृथ्वीचा सर्वात खालचा बिंदू आणि त्यातील जीवंत चमत्कार; वाचा का आहे जगाला ‘या’ महासागराचे इतके आकर्षण?

Nov 16, 2025 | 08:30 PM
“राया… कुठं-कुठं जायचं Christmas ला?” देशात फिरा किंवा बाहेरगावी, विमानाचा दर जवळपास सारखाच

“राया… कुठं-कुठं जायचं Christmas ला?” देशात फिरा किंवा बाहेरगावी, विमानाचा दर जवळपास सारखाच

Nov 16, 2025 | 08:26 PM
अमेरिकेच्या ‘या’ निर्णयामुळे भारतीय ट्रक चालकांच्या वाढल्या अडचणी; अनेकांचे परवाने रद्द होण्याची शक्यता

अमेरिकेच्या ‘या’ निर्णयामुळे भारतीय ट्रक चालकांच्या वाढल्या अडचणी; अनेकांचे परवाने रद्द होण्याची शक्यता

Nov 16, 2025 | 08:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : तिसरी मुंबई प्रकल्पात तणाव वाढला, सीमांकन थांबवण्याची शेतकऱ्यांची ठाम मागणी

Raigad : तिसरी मुंबई प्रकल्पात तणाव वाढला, सीमांकन थांबवण्याची शेतकऱ्यांची ठाम मागणी

Nov 16, 2025 | 07:27 PM
सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही

सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही

Nov 16, 2025 | 07:22 PM
Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया

Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया

Nov 16, 2025 | 07:01 PM
Mahad : महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप युतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Mahad : महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप युतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Nov 16, 2025 | 05:05 PM
Nagpur : किल्ल्यावर दारु पार्टीला परवानगी मिळतेच कशी? – वडेट्टीवार

Nagpur : किल्ल्यावर दारु पार्टीला परवानगी मिळतेच कशी? – वडेट्टीवार

Nov 16, 2025 | 05:01 PM
Karjat : कर्जत नगराध्यक्षपदी महायुतीकडून डॉ. स्वाती अक्षय लाड यांची उमेदवारी जाहीर

Karjat : कर्जत नगराध्यक्षपदी महायुतीकडून डॉ. स्वाती अक्षय लाड यांची उमेदवारी जाहीर

Nov 16, 2025 | 03:54 PM
URAN : चलो बस अ‍ॅपवरून ऑनलाईन बुकींग करूनच प्रवास, उरण ते मुंबई आणि नवी मुंबई

URAN : चलो बस अ‍ॅपवरून ऑनलाईन बुकींग करूनच प्रवास, उरण ते मुंबई आणि नवी मुंबई

Nov 16, 2025 | 03:42 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.