
Budget 2026 Live: मोठी बातमी! 1 एप्रिलपासून नवा Income Tax Law लागू; अपघात विम्याची रक्कमही करमुक्त अन्...
1 एप्रिलपासून नवा आयकर कायदा लागू होणार
अपघात विमा करमुक्त असेल
आयकर परतावा भरण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत
Union Budget 2026 Live Updates: नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करत आहेत. यामध्ये आरोग्य, कृषी, संरक्षण, पर्यटन आणि अन्य क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग 9 व्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहे. अर्थमंत्री सीतारमण यांनी आयकर विषयी मोठी घोषणा केली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली मोठी घोषणा
1 एप्रिलपासून नवा आयकर कायदा लागू होणार
अपघात विमा करमुक्त असेल
आयकर परतावा भरण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत
आयकरण भरणे आता अधिक सुटसुटीत
अघोषित संपत्तीवर दंडाऐवजी कर भरण्याची तरतूद
अपघात विम्यातून मिळालेली रक्कम करमुक्त
आज सादर करण्यात आलेल्या बजेटमध्ये टीसीएस दर कमी करण्यात आला आहे. 5 टक्के असलेला टीसीएस दर आता 2 टक्के करण्यात आला आहे. पूर्वी गरजेचा असेलेला टीएएन आता आवश्यक नसणार आहे. सुधारित रिटर्नसाठी अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2026-2027 मध्ये जीडीपीच्या 4.3 टक्के वित्तीय तूट राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अपघाती विम्यावर मिळणाऱ्या रकमेवर आता कर लागणार नाहीये.
‘या’ तरतुदींमुळे बेरोजगारांची होईल सुटका
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात केवळ आर्थिक तरतुदीच नाहीत, तर रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी एक दूरदृष्टी असलेला आराखडा मांडला आहे. “तरुणांना केवळ पदवीधर करणे नव्हे, तर त्यांना थेट उद्योगांच्या गरजेनुसार ‘रोजगारक्षम’ (Job-ready) बनवणे” हे या बजेटचे मुख्य सूत्र आहे. (union budget 2026 roadmap of employment)
‘कॉर्पोरेट मित्र’: लहान शहरांतील तरुणांसाठी सुवर्णसंधी
टियर-२ आणि टियर-३ शहरांमधील तरुणांना व्यावसायिक प्रवाहात आणण्यासाठी सरकारने ‘कॉर्पोरेट मित्र’ ही संकल्पना मांडली आहे. ICAI (Chartered Accountants), ICSI (Company Secretaries) आणि ICMAI (Cost Accountants) यांसारख्या नामवंत संस्थांच्या मदतीने छोटे कोर्सेस सुरू केले जातील. यामुळे लहान शहरांतील तरुणांना स्थानिक पातळीवरच कंपन्यांचे कायदेशीर आणि आर्थिक कामकाज सांभाळण्याचे कौशल्य मिळेल, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर स्वयंरोजगार आणि नोकऱ्या निर्माण होतील.
हाय-टेक सेक्टर: सेमीकंडक्टर आणि एआय
भारताला तंत्रज्ञानाचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी ‘इंडिया सेमीकंडक्टर मिशन २.०’ ची घोषणा करण्यात आली आहे. यात केवळ फॅक्टरी उभारण्यावर भर नसून, ‘कुशल कार्यबल’ (Skilled Workforce) तयार करण्यासाठी उद्योगांच्या नेतृत्वाखालील संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली जातील. तसेच ‘एआय सपोर्ट न्यू’ धोरणामुळे भविष्यातील तांत्रिक नोकऱ्यांसाठी भारतीय तरुण सज्ज होतील.