
भारतीय रुपयांची नीचांकी घसरण (फोटो सौजन्य - iStock)
परदेशी गुंतवणूकदारांकडून होणारी सततची विक्री, तसंच परदेशी गुंतणुकदारांनी मार्केटमधून काढून घेतलेला पैसा आणि इराणमधील वाढता तणाव यांचा रुपयावर स्पष्टपणे परिणाम होत आहे. आकडेवारीनुसार, या आर्थिक वर्षात आतापर्यंत रुपया सुमारे ११ टक्क्यांनी कमकुवत झाला आहे. गेल्या दशकाहून अधिक काळातील भारतीय चलनाची ही सर्वात मोठी कमजोरी मानली जात आहे. चला, यावर अधिक जाणून घेऊया.
रुपयाच्या घसरणीची कारणे
१. तज्ज्ञांच्या मते रुपयाची घसरण ही कच्च्या तेलाच्या किमतीतील बदलांमुळे झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या किमती अनेक आठवडे प्रति बॅरल १०० डॉलरपेक्षा जास्त राहू शकतात, ज्यामुळे देशात महागाईचा धोका वाढत आहे. याचा थेट परिणाम रुपयावर होत आहे.
२. दुसरीकडे, परदेशी गुंतवणूकदार भारतीय देशांतर्गत बाजारापासून अधिकाधिक दूर जात आहेत. आकडेवारीनुसार, परदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या एका महिन्यात भारतीय शेअर बाजारातून अंदाजे १३ अब्ज डॉलर्स काढून घेतले आहेत, ज्यामुळे रुपयाची घसरण सुरूच आहे.
३. मध्य-पूर्वेतील तणावामुळे रुपयावर दबाव आहे. युद्ध सुरू झाल्यापासून रुपया अंदाजे ४ टक्क्यांनी घसरला आहे. या घसरणीमुळे सध्याच्या अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास डगमगला आहे.
रुपया ‘शतकी’ टप्प्याच्या आणखी जवळ… डॉलरच्या तुलनेत ९४ ची पातळी ओलांडली; जाणून घ्या सविस्तर
रुपयाची पुढील वाटचाल कशी असेल?
विविध माध्यमांच्या वृत्तानुसार, इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध संपेपर्यंत रुपयामध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची शक्यता नाही. तथापि, सरकार आपल्या स्तरावर रुपयाला आधार देण्यासाठी प्रयत्न करत आहे. तरीही हा प्रयत्न किती यशस्वी होऊ शकतो, यावर अनेक तज्ज्ञांमध्येही मतभेद आहेत. सध्या अमेरिका-इराण-इस्रायलच्या युद्धामुळे जगभरात त्याचे पडसाद उमटत आहेत आणि भारतालाही त्याचा फटका पडलेला दिसून येत आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांना काहीसा दिलासा मिळू शकतो. तथापि, या निर्णयाचा सरकारी तिजोरीवर परिणाम होऊ शकतो आणि सरकारी महसुलात घट होऊ शकते.