
(फोटो सौजन्य: chatgpt)
‘ग्रामोदयम’ हा ग्रामीण भारतातील युवकांना समर्पित विशेष उपक्रम आहे. या कार्यक्रमाचा उद्देश होतकरू उद्योजकांची ओळख पटविणे, त्यांना मार्गदर्शन करणे, आवश्यक प्रशिक्षण देणे आणि त्यांना सक्षम बनविणे हा आहे. या अंतर्गत त्यांना उद्योगाच्या गरजांनुसार कौशल्ये, उद्योजकतेशी संबंधित क्षमता तसेच आवश्यक सहाय्य यंत्रणांची उपलब्धता करून दिली जाईल. युवा नवोन्मेषकांना त्यांच्या कल्पनांचे व्यवहार्य उद्योगांमध्ये रूपांतर करण्यास सक्षम करून ‘ग्रामोदयम’ चे उद्दिष्ट स्थानिक संधींचे शाश्वत आर्थिक विकास आणि रोजगारनिर्मितीच्या प्रभावी माध्यमांमध्ये रूपांतर करणे हे आहे.
हा कार्यक्रम डिजिटल-फर्स्ट हायब्रिड अंमलबजावणी मॉडेलवर आधारित असून, देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये त्याची समान पोहोच सुनिश्चित करण्याचा उद्देश आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया सहभाग, समुदाय संपर्क तसेच तळागाळातील जनजागृती मोहिमांच्या माध्यमातून इच्छुक उद्योजकांची नोंदणी केली जाईल आणि त्यांना उद्योजकतेच्या सुबद्ध प्रवासासाठी आवश्यक मार्गदर्शन दिले जाईल. या प्रवासामध्ये सायकोमेट्रिक मूल्यमापन, समुपदेशन, उद्योजकता विकास प्रशिक्षण, उद्योग/व्यवसाय-विशिष्ट प्रशिक्षण, मार्गदर्शन (मेंटॉरशिप) तसेच उद्योग स्थापनासाठी आवश्यक सहाय्याचा समावेश असेल. यामुळे सहभागी उद्योजकांना कल्पनेच्या संकल्पनेपासून (आयडिएशन) ते यशस्वी उद्योग उभारणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर सर्वसमावेशक मार्गदर्शन आणि सहाय्य मिळेल.
पारंपरिक कौशल्य विकासाच्या पुढे जात ‘ग्रामोदयम’ हा कार्यक्रम सर्वसमावेशक सहाय्य व्यवस्था उपलब्ध करून देतो. यामध्ये व्यावसायिक संधींची ओळख, व्यवसाय आराखडा तयार करणे, उद्योग व्यवस्थापन प्रशिक्षण, कर्जसुविधा, बाजारपेठेशी जोडणी, मार्गदर्शन (मेंटॉरशिप) तसेच उद्योग स्थापन झाल्यानंतरही सातत्यपूर्ण मार्गदर्शन व सहाय्य (हँडहोल्डिंग) यांचा समावेश आहे. हा कार्यक्रम केवळ स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यापुरता मर्यादित नसून, शाश्वत उद्योग विकासाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती आणि समुदाय विकासाला चालना देण्यासाठीही तयार करण्यात आला आहे. अशा प्रकारे, हा कार्यक्रम सर्वसमावेशक आणि सक्षम ग्रामीण आर्थिक विकासाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देईल.
कार्यक्रमांतर्गत नोंदणी झालेल्या सर्व लाभार्थ्यांचे एनएसडीसीच्या माध्यमातून ई-केवायसी (e-KYC) पडताळणी करण्यात येईल. त्यामुळे लाभार्थ्यांच्या सहभागामध्ये पारदर्शकता आणि प्रामाणिकता सुनिश्चित केली जाईल.प्रायोगिक (पायलट) टप्प्यात *‘ग्रामोदयम’*चा उद्देश विस्तारक्षम (स्केलेबल) आणि टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणाऱ्या अंमलबजावणी यंत्रणेद्वारे तीन वर्षांच्या कालावधीत सुमारे ४,००० ग्रामीण उद्योजक घडविणे आणि त्यांना आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देणे हा आहे.
‘ग्रामोदयम’ची एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याची सर्वसमावेशक कर्जसुविधा (एंड-टू-एंड क्रेडिट फॅसिलिटेशन) व्यवस्था. कार्यक्रमातील सहभागीांना बँक कर्जासाठी उपयुक्त सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि सहाय्य दिले जाईल. तसेच, त्यांना नाबार्ड समर्थित प्रादेशिक ग्रामीण बँका (आरआरबी) तसेच इतर वित्तीय संस्थांकडून कर्जसहाय्य मिळविण्यासाठी आवश्यक संपर्क आणि सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल.याशिवाय, या कार्यक्रमांतर्गत डिजिटल कर्ज अर्ज करण्यासाठी सहाय्य तसेच संबंधित शासकीय योजना आणि प्रोत्साहनांविषयी मार्गदर्शनही दिले जाईल. यामुळे औपचारिक वित्तीय सेवांपर्यंतची पोहोच अधिक सुलभ होईल आणि नवीन उद्योग उभारणीतील आर्थिक अडथळे कमी करण्यास मदत मिळेल.
कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची रचना एनएसडीसीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मशी एकात्मिक केली जाईल, ज्यामुळे लाभार्थ्यांच्या प्रगतीवर रिअल-टाइम देखरेख आणि मागोवा (ट्रॅकिंग) घेणे शक्य होईल. लाभार्थ्यांची निवड व सहभागीकरण (मोबिलायझेशन), प्रशिक्षण, उद्योगाची स्थापना आणि त्यानंतरच्या विकासापर्यंत प्रत्येक टप्प्यावर ही देखरेख केली जाईल.कार्यक्रमाच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन करण्यासाठी एक सर्वसमावेशक इम्पॅक्ट असेसमेंट फ्रेमवर्क विकसित करण्यात आले आहे. या अंतर्गत प्रमुख कार्यप्रदर्शन निर्देशकांचे (Key Performance Indicators – KPI) नियमितपणे निरीक्षण केले जाईल. यामध्ये लाभार्थ्यांचे सहभागीकरण, लैंगिक समावेशकता, प्रशिक्षण पूर्णत्वाचा दर, प्रमाणपत्रांचे निष्कर्ष, जीएसटी आणि उद्यम (UDYAM) नोंदणी, उद्योगांचे कार्यान्वयन तसेच पडताळणी केलेल्या व्यावसायिक नोंदींच्या आधारे सरासरी विक्री कामगिरीचे मूल्यांकन यांचा समावेश असेल.
‘ग्रामोदयम’च्या माध्यमातून नाबार्ड आणि एनएसडीसी यांनी उद्योजकतेवर आधारित ग्रामीण परिवर्तनाला चालना देण्याची आपली वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली आहे. कौशल्य विकास, मार्गदर्शन (मेंटॉरशिप), डिजिटल नवोपक्रम, वित्तीय सेवांपर्यंतची पोहोच आणि बाजारपेठेशी जोडणी यांचा समन्वय साधत हा कार्यक्रम ग्रामीण उद्योजकांची नवी पिढी घडविण्याचा प्रयत्न करेल. ही पिढी सर्वसमावेशक विकासाला गती देईल, स्थानिक अर्थव्यवस्था अधिक सक्षम करेल आणि भारताच्या समृद्धी व आत्मनिर्भरतेच्या प्रवासात मोलाचे योगदान देईल. हा उपक्रम माननीय पंतप्रधानांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेला साकार करण्याच्या दिशेनेही महत्त्वपूर्ण योगदान देईल.