(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
India Petrol Export To Russia : रशियावर का आली अशी वेळ? भारताकडे मागतोय पेट्रोल! काय नेमकं कारण?
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमधील वीज संकट अधिकच गडद होत आहे. नेपाळच्या दोन जिल्ह्यांमधील विद्यमान वीज प्रकल्प, तसेच सुरू असलेले अंदाजे नऊ जलविद्युत प्रकल्पांवर यामुळे मोठा परिणाम झाला आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते शालिग्राम भंडारी यांच्या म्हणण्यानुसार, ही समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी पथके कार्यरत आहेत, परंतु भारताच्या मदतीशिवाय हे शक्य होणार नाही.
भारत सरकार सप्टेंबर महिन्यापासून नेपाळच्या पुरवठ्याच्या विनंतीवर विचार करत आहे. सध्याच्या वीज व्यापार प्रणालीअंतर्गत नेपाळला अधिक वीज पुरवठा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. इंडियन इलेक्ट्रिसिटी एक्सचेंजच्या डे-अहेड मार्केट म्हणजेच DAM आणि रिअल-टाइम मार्केट RTM यांसारख्या प्रणालींच्या माध्यमातून वीज पुरवठा केला जाण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती यासाठीही महत्त्वाची आहे, कारण नेपाळ साधारणपणे पावसाळ्यात आपल्या जलविद्युत प्रकल्पांमधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज भारताला निर्यात करतो. मात्र, यावेळी पूर आणि पायाभूत सुविधांच्या नुकसानीमुळे विजेचा प्रवाह उलटण्याची शक्यता आहे, ज्यामुळे भारताला नेपाळला वीज पाठवावी लागणार आहे. दोन्ही देश एकमेकांना वीजपुरवठा करतात. त्यामुळे भारत ही तयारी दाखवणार हे निश्चित आहे.
वीज निर्मितीतील घटीचा परिणाम भारताला होणाऱ्या वीज निर्यातीवरही झाला आहे. अहवालानुसार, भारताला होणारा वीजपुरवठा अंदाजे ९५०-१००० मेगावॅट इतका असतो. म्हणजे अंदाजे ४०० मेगावॅटपर्यंत घसरला आहे. अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील व्यक्तींच्या मते, नेपाळमधील वीज निर्मितीतील घटीचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही.
अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय की भारताला ऊर्जेचे पर्यायी स्रोत शोधण्याची गरज नाही. आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारताची मोठी राष्ट्रीय ग्रीड क्षमता आणि मजबूत उत्पादन साठवणूक व्यवस्था ग्रीडच्या स्थिरतेशी तडजोड न करता किंवा किरकोळ पुरवठ्यात व्यत्यय न आणता ४०० मेगावॅटची तूट सहजपणे भरून काढू शकतो.
BRICS Digital Payment : 11 देशांमध्ये होणार थेट डिजिटल व्यवहार! ब्रिक्स परिषदेत भारताची मोठी योजना






