
(फोटो- सोशल मिडिया)
RBI Rule: तुमचे किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचे असे एखादे जुने बँक खाते असेलच ना जे गेल्या अनेक वर्षांपासून निष्क्रिय अवस्थेत आहे? किंवा एखाद्या विशिष्ट खात्यात जमा असलेली रक्कम बरीच वर्षे वापरलीच गेली नाहीये? पण आत पैसे काढला येतील का? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. भारतीय रिझर्व्ह बँकेने अशा प्रकारच्या निष्क्रिय आणि दावा न केलेल्या बँक खात्यांच्या संदर्भात नवीन नियम लागू केला आहेत; ज्यामुळे लोकांना त्यांच्या जुन्या खात्यांमध्ये अडकलेली रक्कम पुन्हा मिळवून घेणं शक्य होणार आहे. ते कसं काय ? समजून घेऊयात.
अडचणी वाढल्या? 45 कोटींच्या गैरव्यवहाराचे दावे, HDFC Bank ने काय दिलं उत्तर?
देशभरात, अनेक वर्षांपासून वापरात नसलेल्या बँक खात्यांमध्ये कोट्यवधी रुपये जमा पडून आहेत. अनेकदा, नोकरीतील बदल, दुसऱ्या शहरात स्थलांतर किंवा केवळ माहितीचा अभाव यांमुळे लोक आपल्या जुन्या खात्यांबद्दल विसरून जातात. त्यामुळे त्यांचे पैसे परत मिळवून देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी RBI ने आता बँकांना निर्देश जारी केले आहेत.
जर एखाद्या बचत किंवा चालू खात्यामध्ये सलग दोन वर्षे तुम्ही वापरलेलेच नसेल किंवा त्यामध्ये कोणतेही व्यवहार झाले नसतील तर बँक त्या खात्याला ‘निष्क्रिय खाते’ म्हणून घोषित करते. पण हे खाते बंद केले जात नाही आणि त्यामध्ये जमा असलेली रक्कम पूर्णपणे सुरक्षित राहते. याउलट, जर एखाद्या खात्यात जमा असलेली रक्कम दीर्घकाळापर्यंत कोणीही दावा न केल्यामुळे तशीच पडून राहिली, तर ती ‘दावा न केलेली ठेव’ म्हणजे Unclaimed Deposit या विभागात गणल्या जातात. RBI च्या नियमांनुसार, जी रक्कम १० वर्षांपर्यंत कोणीही दावा न केल्यामुळे तशीच राहते, ती त्यानंतर आरबीआयच्या ‘DEAF’ मध्ये हस्तांतरित केली जाते.
आरबीआयने हे स्पष्ट केले आहे की, जरी एखाद्या खात्यातील रक्कम ‘DEAF’ मध्ये हस्तांतरित केली गेली असली, तरीही खातेदार किंवा त्यांचे कायदेशीर वारस त्या रकमेवर आपला दावा सांगू शकतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, जरी १० वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधी उलटून गेला असला, तरीही तुमचे पैसे जप्त होत नाहीत. यासाठी, ग्राहकाने संबंधित बँकेच्या शाखेत प्रत्यक्ष भेट देऊन अर्ज करणं गरजेचं आहे. बँक आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करेल आणि माहितीची अचूक आहे हा विश्वास पटल्यानंतर, ती रक्कम परत केली जाऊ शकते. जर खातेदाराचे निधन झाले असेल, तर त्यांचे nominee किंवा कायदेशीर वारस देखील त्या रकमेवर दावा सांगू शकतात.
जनतेच्या सोयीसाठी, आरबीआयने ‘UDGAM’ नावाचे एक पोर्टल देखील सुरू केले आहे. या पोर्टलला भेट देऊन, ग्राहक विविध बँकांमध्ये जमा असलेल्या आणि अद्याप दावा न केलेल्या ठेवींबद्दलची माहिती शोधू शकतात. ही माहिती मिळवण्यासाठी मोबाईल क्रमांक आणि इतर काही आवश्यक तपशीलांची आवश्यकता असते. तज्ञांचा असा सल्ला आहे की, व्यक्तींनी आपल्या जुन्या बँक खात्यांशी संबंधित तपशील वेळोवेळी अपडेट करत राहिले पाहिजे. शिवाय, भविष्यात कुटुंबाला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी, प्रत्येक बँक खात्यासाठी एका nominee चं नाव नोंदवणं आवश्यक आहे.
RBI च्या नावाने कोट्यवधींच्या लॉटरीचे मेसेज? केंद्र सरकारच्या PIB कडून बनावट घोटाळ्याचा Alert!