
Production Linked Incentive Scheme: ईव्ही स्टार्टअप्ससाठी PLI नियम शिथिल करा; यूलर मोटर्सची मागणी (फोटो-सोशल मीडिया)
Production Linked Incentive Scheme: इलेक्ट्रक वाहन (EV) स्टार्टअप्सना फायदा व्हावा आणि देशाच्या ग्रीन मोबिलिटी प्रवासात योगदान द्यावे, यासाठी भारतातील ऑटोमोबाइल पीएलआय योजनेचे नियम शिथिल करणे आवश्यक असल्याचे यूलर मोटर्सचे संस्थापक आणि सीईओ सौरव कुमार म्हणाले आहेत. तसेच, कुमार म्हणाले की, ऑटो क्षेत्रासाठी पीएलआयसाठी निश्चित केलेल्या उच्च महसूल आणि गुंतवणूक मर्यादांमुळे यूलर मोटर्ससारख्या कंपन्यांना या योजनेत सहभागी होण्यापासून रोखले गेले आहे.
Iran-Israel War: मध्य पूर्वेतील युद्धाचा परिणाम; खत पुरवठ्यावर भविष्यात संकटाची शक्यता
कंपनी लहान इलेट्रिक ट्रक आणि तीन चाकी वाहनांच्या विभागात सक्रिय आहे. एका ओईएमचा किमान जागतिक गट महसूल १०,००० कोटी आणि स्थिर मालमत्तेत ३,००० कोटी गुंतवणूक असणे आवश्यक आहे. कुमार यांनी सांगितले, आमच्यासारख्या स्टार्टअप्सना प्रोत्साहन मिळाले नाही, जे या क्षेत्रात समान गुंतवणूक करत आहे. तंत्रज्ञान आणि संशोधन आणि विकासात प्रगती करत आहेत. युलर मोटर्सकडे इलेक्ट्रिक चारचाकी आणि तीनचाकी व्यावसायिक मालवाहू वाहने आहेत, जी पीएलआय योजनेअंतर्गत येतात, असे कुमार म्हणाले.
उत्पादनांच्या बाबतीत, यूलर मोटर्सकडे इलेक्ट्रक चारचाकी आणि तीनचाकी व्यावसायिक मालवाहू वाहने आहेत, जी पीएलआय योजनेच्या कक्षेत येतात. उद्योगात फार कमी कंपन्या आहेत, ज्या प्रत्यक्षात ईव्हीचा प्रचार करत आहेत, अगदी चारचाकी क्षेत्रातही. म्हणून, सरकारने आपल्यापैकी बहुतेकांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे कुमार म्हणाले. केवळ स्थिर मालमत्तेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, स्टार्टअप्सनी केलेल्या एकूण गुंतवणुकीची व्याप्ती वाढविता येईल. आम्ही आधीच सुमारे १,५०० कोटींची गुंतवणूक केली आहे. पुढील दोन ते अडीच वर्षांत आणखी ५०० ते १,००० कोटींची गुंतवणूक करू. आम्ही आधीच ३,००० कोटींच्या गुंतवणूक निकषांची पूर्तता करण्याच्या मार्गावर आहे.
जर सरकार ते शिथिल करू शकले आणि असे म्हणू शकले की “स्थिर मालमत्तेच्या गुंतवणुकीऐवजी आपण एकूणच गुंतवणूक करत आहोत, तर ते उपयुक्त ठरेल कारण ते “या क्षेत्रात होणारी एक अतिशय महत्त्वपूर्ण गुंतवणूक आहे,” असे कुमार यांनी नमूद केले. तथापि, त्यांनी स्पष्ट केले की युलर मोटर्ससारख्या कंपनीला सरकारने हे फक्त मोठ्या चॅम्पियन OEM साठी का केले याबद्दल “कोणतीही शंका नाही” कारण जेव्हा ही योजना तयार केली गेली तेव्हा “काही विशिष्ट वस्तुनिष्ठ आणि विचार प्रक्रिया” असेल.