
कर्जाचा हप्ता वाढणार की कमी होणार? सामान्यांचे डोळे आरबीआयच्या पतधोरणाकडे! (Photo Credit - Ai)
बँक ऑफ बडोदाच्या अहवालानुसार, आता स्वस्त कर्जाचा किंवा व्याजदर कपातीचा काळ संपला असून, आरबीआय दीर्घकाळापर्यंत दर स्थिर ठेवू शकते. जागतिक परिस्थिती पाहता केंद्रीय बँक सध्या ‘तटस्थ’ भूमिका घेईल. मात्र, जर महागाईने 6 टक्क्यांची उच्च मर्यादा ओलांडली, तर वर्षाच्या अखेरीस व्याजदरात वाढ करण्याचे पाऊलही आरबीआय उचलू शकते.
अमेरिका आणि इरानेमधील संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाला आहे. विशेषतः ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ बंद झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 100 डॉलर्सच्या पार गेल्या आहेत. याचा थेट परिणाम भारताच्या आर्थिक गतीवर आणि महागाईवर होणार आहे. पुढील 3-4 महिन्यांतील परिस्थितीचा आढावा घेऊन आरबीआय व्याजाच्या दिशा ठरवेल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
Stock Market News: RBI चा मोठा निर्णय, Capital Market नियमांना 1 जुलैपर्यंत मुदतवाढ
जागतिक अस्थिरतेमुळे भारतीय बाजारपेठेत मोठ्या घडामोडी घडत आहेत:
मुख्य आर्थिक सल्लागारांनी (CEA) अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या बुलेटिनमध्ये चालू खात्यातील तूट (CAD) आर्थिक वर्ष 2027 मध्ये मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. बँक ऑफ बडोदाने आर्थिक वर्ष 2026 साठी जीडीपी विकासदर 7.6 टक्के, तर 2027 मध्ये तो 7 ते 7.2 टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचा सुधारित अंदाज वर्तवला आहे.
जर आरबीआयने रेपो रेट 5.25 टक्क्यांवर स्थिर ठेवला, तर गृहकर्ज (Home Loan) आणि वाहन कर्जाच्या (Car Loan) हप्त्यांमध्ये (EMI) सध्या कोणताही बदल होणार नाही. मात्र, इंधन दरवाढीमुळे महागाई वाढल्यास सर्वसामान्यांचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. रुपयाला आधार देण्यासाठी आणि बाजारातील तरलता नियंत्रित करण्यासाठी आरबीआय काही कठोर पावले उचलण्याची शक्यता या अहवालात वर्तवण्यात आली आहे.
Bank Holidays : एप्रिलमध्ये तब्बल 14 दिवस बँका राहणार बंद; आताच करून घ्या महिन्याभराचं प्लॅनिंग