
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
चार वर्षांपासून नशीब आजमावत असलेले केरळचे ४४ वर्षीय सैदलवी करिओदन वारीचलील. एक दिवस असा येईल की आपलं नशीब उजळेल आणि आपल्यालाही यश मिळेल या आशेने आपल्या मित्रांसोबत लॉटरीची तिकिटे खरेदी करत होते. अखेरीस, नशिबाने त्यांचं ऐकलं आणि नुकत्याच झालेल्या बिग तिकीट ड्रॉमध्ये त्यांनी १,००,००० दिरहॅमचे सुमारे २६ लाख रुपयांचं बक्षीस जिंकलं आहे.
सैदलवी गेल्या १७ वर्षांपासून युएईमध्ये राहत असून तेथील एका शाळेत चौकीदार म्हणून काम करतो. त्याला त्याच्या मित्रांकडून ‘बिग तिकीट’बद्दल कळले. आणि मग, दर महिन्याला ते आणि त्याचे मित्र मिळून एक ग्रुप म्हणून तिकिटं खरेदी करू लागले.
‘बिग तिकीट’च्या सिरीज २८९ च्या पाच नशिबवान विजेत्यांपैकी एक म्हणून सैदलवीची निवड झाली. त्याचे मित्र अनुब यांनी रँडमली विजेते तिकीट निवडले. जॅकपॉट जिंकल्यानंतर, सैदलवीने सांगितले की तो बक्षिसातील आपला वाटा भारतातील आपल्या कुटुंबाला पाठवणार आहे.
‘बिग तिकीट’च्या इतर सहभागींना प्रोत्साहन देताना सैदलवी म्हणाला, “आशा जिवंत ठेवा! तुमचाही दिवस येईल.” जिंकल्यानंतर, ते आपले नशीब आजमावणे थांबवणार नाही असंही त्यांनी सांगितले. त्याने पुढच्या ड्रॉसाठी आधीच दुसरे तिकीट खरेदी करुन ठेवली आहेत. त्यामुळे कधी कोणाचा दिवस येईल आणि कोणाचं नशीब कसं बदलेलं सांगता येत नाही. त्यामुळे लॉटरीमध्ये माहित नाही पण आयुष्यातील प्रत्येक प्रसंग आशावादी ठेवला तर जगण्याची उम्मीद वाढते.