
admission
11th Admission 2026: दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना अजूनही मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दखला मिळला नाही. या कारणामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेत अडथळा होऊ नये, म्हणून प्रवेश निश्चित करताना कागदपत्रे तात्काळ सादर करण्याची सक्ती न करण्याचे निर्देश शिक्षणमंत्री याच्याकडून देण्यात आले आहेत. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या निर्देशानुसार, अकरावी ऑनलाइन प्रवेशासंबंधित एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कागदपत्रांच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
वर्ष २०२६-२७च्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी सुरू २९ मे २०२६असून रोजी गुणवत्ता यादी जाहिर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश निश्चत करण्यासाठी मूळ गुणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शथिल करण्यात आली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना गुणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला उपलब्ध होताच सादर करण्यात येईल, असे हमीपत्र घेऊन प्रवेश निश्चत करता येईल.
ज्या विद्यार्थ्याचे आधार व्हेरिफाइड आहे त्यांना गुणपत्रक डिजिलॉकरमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला वेळेत सादर न झाल्यास विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द होऊ शकतो, अशा सूचनाही विद्यार्थी पालकांना देण्यात आल्या आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या अकरावी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत २९ मे २०२६ रोजी पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे, मात्र अनेक विद्यार्थ्यांना शाळेतून अद्यापही गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला मिळाला नसल्याने शालेय मंत्री दादा भिसे यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देणारे निर्देश जारी केले आहेत. या निर्देशानुसार, महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित करताना विद्यार्थ्यांसाठी गुणपत्रक आणि एलसी सादर करण्याची अट तात्पुरती शिथिल करण्यात आली आहे. तसेच केवळ कागदपत्रे नाहीत, यामुळे कोणतेही महाविद्यालय गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारू शकत नाही.