Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE 10th Board Result: ‘बेस्ट ऑफ टू’ नियमामुळे १० वीच्या निकालात कसा झाला बदल? जाणून घेण्यासाठी एकदा वाचाच..

CBSE 10th Board Result : CBSE १० वीच्या 'बेस्ट ऑफ टू' व्यवस्थेमुळे उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.७८% वर पोहोचली आहे. ६० टक्के विद्यार्थ्यांनी गुण सुधारले असून एकाच परीक्षेचा ताण कमी झाला आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 28, 2026 | 03:30 PM
cbse 10th

cbse 10th

Follow Us
Follow Us:

CBSE 10th Board Result update: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने पहिल्यांदाच आयोजित केलेल्या इयत्ता दहावीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा सकारात्मक परिणाम निकालांवर पाहायला मिळाला आहे. एका अहवालानुसार, ‘बेस्ट ऑफ टू’ ही व्यवस्था लागू झाल्यानंतर केवळ एकूण उत्तीर्ण होण्याच्या टक्केवारीतच वाढ झाली नाही, तर विद्यार्थ्यांवरील एकाच बोर्ड परीक्षेचा ताणही कमी झाला. तज्ज्ञांच्या मते, या नवीन व्यवस्थेने विद्यार्थ्यांना आपल्या चुकांमधून शिकून अधिक चांगली कामगिरी करण्याची संधी दिली आहे.

एकूण निकाल ९६.७८ टक्क्यांवर पोहोचला

अहवालानुसार, मुख्य परीक्षा आणि दुसरी बोर्ड परीक्षा यांचे निकाल एकत्र केल्यानंतर २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता १० वीचा एकूण निकाल वाढून ९६.७८ टक्के झाला आहे. मुख्य परीक्षेनंतर हा आकडा सुमारे ९३.७० टक्के इतका होता. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, दुसऱ्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अंतिम निकालात समाविष्ट केल्यामुळे आणि मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे गुण सुधारल्यामुळे एकूण टक्केवारीत ही वाढ झाली आहे.

Success Story: एका माजी शिक्षिकेने मुलासोबत कसे उभारले १५ कोटींचे साम्राज्य? जाणून घ्या एका क्लिकवर..

६० टक्के विद्यार्थ्यांनी वाढवले गुण

अहवालानुसार, दुसऱ्या बोर्ड परीक्षेस बसलेल्या सुमारे ६० टक्के विद्यार्थ्यांनी आपले गुण सुधारण्यात यश मिळवले. यामध्ये अशा विद्यार्थ्यांचाही समावेश होता, जे पहिल्या परीक्षेतील कामगिरीवर समाधानी नव्हते किंवा काही वैयक्तिक कारणांमुळे शिक्षक आणि पालकांच्या सल्ल्याने पुन्हा परीक्षेला बसले होते.

एकाच परीक्षेचा ताण झाला कमी

शिक्षण विभागातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत सुरू करण्यात आलेली ही व्यवस्था विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा घेऊन आली आहे. आता विद्यार्थ्यांना एकाच परीक्षेतील कामगिरीवर पूर्णपणे अवलंबून राहावे लागत नाही. दुसऱ्या परीक्षेमुळे त्यांना अतिरिक्त तयारीसाठी वेळ मिळतो आणि ते सर्व विषयांचा अभ्यास करण्याऐवजी केवळ निवडक विषयांवर लक्ष केंद्रित करून चांगली कामगिरी करू शकतात. यामुळे परीक्षेचा मानसिक ताणही कमी होतो.

History of Languages: एका काळी पृथ्वीवर बोलल्या जायच्या ७५ हजारांहून अधिक भाषा! मग हजारो भाषा कुठे गायब झाल्या? जाणून घ्या..

काय आहे ‘बेस्ट ऑफ टू’ नियम?

CBSE ने २०२६ मध्ये इयत्ता १० वीसाठी ‘बेस्ट ऑफ टू’ ही व्यवस्था लागू केली आहे. यानुसार, जर एखादा विद्यार्थी दोन्ही बोर्ड परीक्षांना बसला, तर प्रत्येक विषयात दोन्ही प्रयत्नांतील गुणांची तुलना केली जाते आणि ज्या परीक्षेत जास्त गुण मिळाले असतील, तेच अंतिम गुणपत्रिकेत जोडले जातात.

Web Title: Cbse 10th board result best of two rule pass percentage increases

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • 10th
  • CBSC
  • CBSE Result
  • education

संबंधित बातम्या

Success Story: एका माजी शिक्षिकेने मुलासोबत कसे उभारले १५ कोटींचे साम्राज्य? जाणून घ्या एका क्लिकवर..
1

Success Story: एका माजी शिक्षिकेने मुलासोबत कसे उभारले १५ कोटींचे साम्राज्य? जाणून घ्या एका क्लिकवर..

Education news: CBSE १२ वीच्या निकालातील गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात; त्यांच्या ‘या’ मागण्या सरकार मान्य करणार का?
2

Education news: CBSE १२ वीच्या निकालातील गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात; त्यांच्या ‘या’ मागण्या सरकार मान्य करणार का?

Education Minister Net Worth: नवीन की जुने… शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी की धर्मेंद्र प्रधान, कोण आहेत सर्वाधिक श्रीमंत?
3

Education Minister Net Worth: नवीन की जुने… शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी की धर्मेंद्र प्रधान, कोण आहेत सर्वाधिक श्रीमंत?

Exam Reforms: पेपर लीक रोखण्यासाठी परीक्षा प्रणालीत ‘हे’ मोठे बदल करणे गरजेचे; जाणून घ्या आयआयटी संचालकांचे महत्त्वाचे वक्तव्य!
4

Exam Reforms: पेपर लीक रोखण्यासाठी परीक्षा प्रणालीत ‘हे’ मोठे बदल करणे गरजेचे; जाणून घ्या आयआयटी संचालकांचे महत्त्वाचे वक्तव्य!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.