
cbsc
CBSE Cyber Security: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सायबर सुरक्षा प्रकरणत आता नवे वळण आले आहे. १९ वर्षीय एथिकल हॅकर निसर्ग अधिकारी याने असा दावा केला आहे की, सीबीएसईने त्याला आपल्या आयटी सिस्टीममधील सुरक्षेच्या त्रुटी शोधण्यासाठी आणि त्या त्रुटी दूर करण्यासाठी आयआयटीच्या सायबर तज्ञाच्या टीमसोबत काम करण्याचे निमंत्रण दिले आहे.
तसेच त्याने एका माध्यम समूहासमोर बोलताना सांगितले की, यासंदर्भात त्यांच्याशी टेक्स्ट मेसेज आणि ईमेल या दोन्ही माध्यमातून संपर्क साधण्यात आला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्याला आयआयटीच्या सायबर सुरक्षा टीममध्ये इंजिनिअर म्हणून सामील होण्यासाठी आमंत्रित केले जात आहे.
परंतु, या दाव्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. सध्या हा दावा निसर्ग अधिकारी यांच्याकडून करण्यात आला आहे. निसर्ग अधिकारी हे तेव्हा चर्चेत आले होते, जेव्हा त्यांनी सीबीएसीच्या विद्यार्थ्यांच्या डेटाशी संबंधित एका पोर्टलमधील सुरक्षेच्या त्रुटींच्या माहिती सार्वजनिक केली होती. त्यानंतर हे प्रकरण गांभीर्याने घेत या डेटाची सायबर टीमने याची तपासणी केली आहे.
अहवालानुसार, आयआयटी मद्रास आणि आयआयटी कानपूरच्या तज्ञांच्या टीमने सुमारे दोन आठवडे सीबीएसईच्या मुख्य कार्यालयात राहून विविध पोर्टलच्या सुरक्षा व्यवस्थेचे आणि तांत्रिक रचनेचे पुनरावलोकन केले. या दरम्यान सुरक्षेच्या त्रुटी दूर करण्यासाठी आणि सिस्टीमला अधिक सुरक्षित बनवण्यासाठी अनेक तांत्रिक बदल करण्यात आले. या सुधारणांनंतर सीबीएसईचे री-इव्हॅल्युएशन पोर्टल २ जून रोजी अवघ्या दोन मिनिटांत तब्बल १३ लाख लॉगिनचे प्रयत्न नोंदवले गेले. तर ३ जून रोजी ही संख्या ३० लाखांहून अधिक झाली. परंतु, यावर सायबर टीमने यावर वेळेवर नियंत्रण मिळवले.
Khan Sir Life Story: ४० रुपयांच्या कमाईपासून कोट्यवधींच्या मालकापर्यंत, कसा आहे खान सरांचा प्रवास?
सीबीएसईची इन हाऊस डेव्हलपर टीम सात्यत्याने सिस्टीमवर काम करत होती. परंतु, त्यांना पुरेशा तांत्रिक मार्गदर्शनाची आणि तज्ञांच्या मदतीची आवश्यकता होती. याच कारणामुळे बाहेरील तज्ञांना विशेषत: आयआयटी संस्थांच्या टीम्सना या प्रक्रियेत सामील करून घेण्यात आले. तसेच आता तांत्रिक मूल्यांकनासाठी आयआयटीच्या तज्ञांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.