फोटो सौजन्य- सोशल मीडिया
मंत्री दादाजी भूसे यांनी मोतोश्री या मुलींच्या वसतिगृहाला भेट देत प्रवेशांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, जुलै 2024 पासून शहरात शिक्षणासाठी आलेल्या मुलींची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या विद्यार्थिंनीना वसतिगृहात आवश्यक सेवा-सुविधा पुरविण्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात येईल.
यावेळी सारथीचे उपसंचालक सुधीर खांदे, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे विभागीय सहसंचालक जी. व्ही. गर्जे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर, सारथीचे संशोधन अधिकारी सुनील दंडगव्हाळ, सहाय्यक लेखाधिकारी मनीषा पाटील, महाज्योतीच्या प्रादेशिक समन्वयक सुवर्णा पगार, गृहपाल अजिता शिंदे, कृषी अधिकारी प्रियांका जगताप, प्रकल्प अधिकारी प्रथमेश गायकवाड यांसह वसतिगृहातील विद्यार्थींनीही उपस्थित होत्या.
पालकमंत्री श्री.भुसे म्हणाले की, नाशिक शहरात ग्रामीण भागातून मुली शिक्षणासाठी येतात. या मातोश्री वसतिगृहात 200 विद्यार्थिंनीची प्रवेशाची क्षमता असून आतापर्यंत 109 विद्यार्थिनी प्रवेश घेतला आहे. वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या मुलींची सुरक्षा ही महत्वाची बाब असून त्यात कोणतीही हयगय वा कसूर होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच आरोग्याच्या दृष्टीने वसतिगृहाचा परिसर स्वच्छ ठेवावा. वसतिगृह प्रवेशासाठी आलेल्या अर्जांवर तत्काळ कार्यवाही करून रिक्त जागांवर प्रवेश देण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री. भुसे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.मुलींना शिक्षणासाठी विविध क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत. चांगले अध्ययन करून यशाचे उच्च शिखर गाठावे, आपल्या आई-वडिलांच्या नावासोबतच नाशिकचे नावही उज्ज्वल करा अशा शब्दात पालकमंत्री श्री. भुसे यांनी विद्यार्थींनीना शुभेच्छा दिल्या.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सारथीच्या प्रवेशित मधुरा खताळे, मयुरी ढोके, महाज्योतीकडून प्रवेशित पल्लवी ढोमसे, कविता माळी व उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून प्रवेशित आरती वाघेरे, श्रद्ध रहाणे या विद्यार्थिंनीना प्रातिनिधीक स्वरूपात वसतिगृह प्रवेशपत्र देण्यात आले
प्रवेश,आवश्यक सुविधा व अडचणी याबाबत चर्चा
यांनतर मातोश्री वसतिगृहातील अधिकाऱ्यांसमवेत पालकमंत्री श्री.भुसे यांनी बैठक घेतली. या बैठकीत वसतिगृहातील प्रवेश,आवश्यक सुविधा व अडचणी याबाबत चर्चा करण्यात आली. वसतिगृहात विद्यार्थिंनींना आवश्यक असलेले जीम साहित्य, क्रीडांगण, ग्रीन जीम, संगणक संच, स्पर्धा परीक्षांची पुस्तके, दूरदर्शन संच इत्यादी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे आश्वासन पालकमंत्री दादा भूसे यांनी दिले. देण्याबाबत पालकमंत्री श्री. भुसे यांनी आश्वासित केले. तसेच विद्यार्थींनींसाठी चांगल्या प्रतीची भोजनाची व्यवस्था ठेवावी आणि वसतिगृहातील नियमांची अमंलबजावणीबाबत सूचनाही दिल्या. वसतिगृहातील कार्यालय, गृहपाल निवास, ग्रंथालय, भोजन कक्ष, करमणूक कक्ष, संगणक कक्ष यांची पाहणी पालकमंत्री श्री.भुसे यांनी केली.