
British Era Institutions
History of British Era Institutions : भारताच्या इतिहासामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत. ज्यांचा प्रभाव आजही आपल्या दैनंदिन जीवनावर पडतो. शाळा, तुरुंग आणि पोस्ट ऑफिस या अशा तीन संस्था आहेत, ज्यांच्याशिवाय समाजाची कल्पना करणेसुद्धा कठीण आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की, भारतात यांची सुरुवात कशी झाली? चला तर मग जाणून घेऊया…
भारतात टपाल सेवेची (Postal Service) सुरवात ब्रिटीश राजवटीत झाली. ईस्ट इंडिया कंपनीने १७२७ मध्ये मुंबईत पहिले पोस्ट ऑफिस सुरू केले होते. त्यांनंतर १७७४ मध्ये वॉरन हेस्टिंग्स यांनी कोलकता येथे जनरल पोस्ट ऑफिस सुरू केले. सुरुवातीला टपाल सेवेचा वापर हा ब्रिटिश कंपन्यांच्या कामासाठी केला जात असे. नंतर ती सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली. भारतात संवाद व्यवस्थेची ही सर्वात मोठी सुरुवात मानली जाते.
भारतात आधुनिक शिक्षणाची सुरुवात १७१५ मध्ये ‘सेंट जॉर्ज एंग्लो इंडियन हायर संकेडरी स्कूल’च्या स्थापनेने झाली. ही शाळा सध्या चेन्नईमध्ये असून भारतातील सर्वात जुन्या आधुनिक शाळांपैकी एक मानली जाते. सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीने ही शाळा ‘मिलिट्री मेल ऑर्फन एसायलम’ म्हणून सुरू केली होती. ब्रिटिश सैनिकांच्या अनाथ मुलांना शिक्षण आणि निवासाची सोय करून देणे, हा त्यापाठीमागचा उद्देश होता. हीच शाळा भारतातील आधुनिक व्यवस्थेच्या सुरुवातीची ओळख मानली जाते.
भारतात आधुनिक कारागृह व्यवस्थेची सुरुवात १९ व्या शतकात झाली. इंग्रजांनी तुरुंगाची निर्मिती केवळ शिक्षेची जागा म्हणून नव्हे तर प्रशासकीय नियंत्रण आणि सुधारणेचे साधन म्हणून केली. १८३५ मध्ये थॉमस बॅबिंग्टन मकॉले यांनी तुरुंग सुधारणेला सुरुवात केली. त्यांनंतर १८३७ मध्ये मद्रास येथे पेनिटेंशियरी म्हणजेच केंद्रीय कारागृहाची स्थापना केली. हे भारतातील सुरुवातीचे तुरुंग मानले जाते. स्वातंत्र्योत्तर काळात स्वातंत्रसैनिकांना अल्मोडा जेलसारख्या ऐतिहासिक तुरुंगात ठेवण्यात आले. जे आजही इतिहासाचे साक्षीदार मानले जाते
एकंदरीत, भारतात शाळेची सुरुवात १७१५ मध्ये,पोस्ट ऑफिसची १७७४ मध्ये तर तुरुंगाची सुरुवात १८३० च्या दशकात झाली. इंग्रजानी उभारलेल्या या संस्था भारताच्या विकास, शिक्षण आणि सामाजिक व्यवस्थेचा भक्कम आधार बनल्या आहेत.
आई-वडिलांचे छत्र हरपले, तरीही पहिल्याच प्रयत्नात IAS कसा झाला अनिमेष प्रधान?