
IAS Anu Kumari Success Story
IAS Anu Kumari Success Story: स्वप्न तेच पूर्ण करतात जे लोकांना शब्दांनी नाही तर कष्टाने उत्तर देतात. आपल्या आयुष्यात असे अनेकदा प्रसंग येतात. जेव्हा लोक आपल्या इच्छाशक्तीवर वार करण्याचा प्रयत्न करतात. असाच अनुभव अनु कुमारीला आला. जेव्हा त्या एका ठिकाणी शंकांचे निरसन करण्यासाठी गेल्या. तेव्हा त्यांना एका कोचिंग क्लासच्या संचालकाने सुनावले की, तुला एवढेही माहिती नसेल तर तुझे सिलेक्शन होईल हे विसरून जा. मात्र या टिकेने त्या खचून न जाता त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू ठेवली आणि आयएएस बनून त्यांनी टीकाकारांना उत्तर दिले.
अनु कुमारी या हरीयाणातील सोनीपतच्या रहिवासी आहेत. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, दिल्ली विद्यापीठातून भौतिकशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली. आयएमटी नागपूर येथून ‘फायनान्स आणि मार्केटिंग’मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २०१५ मध्ये त्यांचा विवाह झाला. पण कुटुंबाच्या जबाबदाऱ्य़ा संभाळत त्यांनी युपीएससीच्या तयारीस सुरुवात केली. अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रीत करता यावे, याकरिता त्यांनी २ वर्ष आपल्या मुलापासून दूर राहिल्या. पहिल्या प्रयत्नात एका गुणाने अपयशी झालेल्या अनु कुमारी यांनी हार न मानता पुन्हा अभ्यास सुरु केला.
NEET Success Story: कुरियर बॉयच्या मुलाने सलग ५ वेळा अपयशी ठरूनही कसे मिळवले ‘नीट’मध्ये यश?
एका व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले की, मुख्य परीक्षेच्या १०-१५ दिवस पूर्वी त्या काही शंकांचे निरसन करण्यासाठी एका कोचिंग क्लासकडे गेल्या, तेव्हा कोचिंग क्लास (AIR 2) मालकाने त्यांना ऐकवले की “तुला एवढेही येत नसेल तर तुझे सिलेक्शन होईल हे विसरुन जा”. मात्र त्यांनी धैर्याने अभ्यासात सातत्य ठेवले. २०१७ मध्ये त्यांनी संपूर्ण भारतातून दुसरा क्रमांक मिळवून लोकांच्या टिकेला उत्तर दिले. ताज्या माहितीनुसार, त्या केरळमधील तिरूवनंतपुरम येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
NEET पेपरफुटीचे धागेदोरे आता लातूरमध्ये? सराव परीक्षेतील ४२ प्रश्न जसेच्या तसे कसे आले?
अनु कुमारी त्यांच्या अभ्यासात अत्यंत शिस्तप्रिय होत्या. तयारीच्या काळात त्या दररोज सुमारे १० ते १२ तास अभ्यास करायच्या. सकाळी लवकर उठून त्या मॉर्निंग वॉकच्या वेळी ‘ऑल इंडिया रेडिओ’ ऐकायच्या आणि जेवताना राज्यसभा टीव्ही पाहायच्या. त्या म्हणतात की, यूपीएससीच्या परीक्षेत प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो. त्यामुळे योग्य रणनीतीच यश मिळवून देते.