
फिजिक्सवालाच्या विद्यार्थ्यांनी सीबीएसईमध्ये मिळवले यश; पुण्यातील विद्यार्थ्यांचाही उत्कृष्ट निकाल
पुणे : सीबीएसई इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा २०२६ मध्ये फिजिक्सवाला संस्थेच्या विद्यार्थ्यांनी देशभर उल्लेखनीय यश मिळवले असून, तिघांनी १०० टक्के गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले, तर पुण्यातील विद्यार्थ्यांचाही उत्कृष्ट निकाल नोंदवला गेला. या परीक्षेत पंजाबमधील फाझिल्का येथील वैभव अरोरा, गुजरातच्या अहमदाबाद येथील अमोलिक पंडिता आणि ओडिशाच्या भुवनेश्वर येथील आयुषमान मोहपात्रा यांनी प्रत्येकी १०० टक्के गुण मिळवत देशात अव्वल स्थान मिळवले. या यशामुळे फिजिक्सवाला या शिक्षण क्षेत्रातील संस्थेची कामगिरी अधोरेखित झाली आहे.
दरम्यान, पुण्यातील फिजिक्सवाला केंद्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यामध्ये ऋतुजा संदीप कानसे (९९ टक्के), अनुराग आनंद शास्त्री (९८.६० टक्के) आणि यशिका मंगलानी (९७.६० टक्के) यांचा समावेश होता. यंदा सीबीएसई दहावी परीक्षेला २५ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. या निकालातून ऑनलाइन आणि संमिश्र शिक्षण पद्धतींचे वाढते महत्त्व अधोरेखित झाले आहे.
“परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा आम्हाला अभिमान वाटतो आणि त्यांच्या समर्पणाचे व कठोर परिश्रमाचे आम्ही कौतुक करतो. ज्या विद्यार्थ्यांनी परिपूर्ण गुण मिळवले आहेत, त्यांचे आम्ही विशेष अभिनंदन करतो. हे निकाल विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि त्यांना मिळालेल्या योग्य शैक्षणिक आधार प्रणालीचे प्रतिबिंब आहेत.” – अलख पांडे संस्थापक फिजिक्सवाला आणि मुख्य कार्यकारी अधिकारी.
अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद
ज्यातील अकरावी प्रवेशासाठी १० एप्रिलपासून सुरू झालेल्या केंद्रीय ऑनलाइन पध्दतीचा अवलंब केला असून, अर्ज नोंदणीला प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अल्पावधीतच दोन लाख ६० हजार ५९५ हून अधिक विद्यार्थ्यांनी अर्जाच्या ‘भाग-एक’ साठी नोंदणी केली आहे. यंदा प्रवेश प्रक्रिया वेळेआधी सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे आणि महाविद्यालयांच्या पसंतीक्रमाची निवड करणे यासाठी अधिक कालावधी उपलब्ध झाला आहे. राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीय ऑनलाइन पद्धतीला यंदाही प्राधान्य देण्यात आले असून विद्यार्थ्यांनी अधिकृत https://mahafyjcadmissions.in/. संकेतस्थळावर जाऊन प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज अचूक भरता यावा यासाठी शाळांच्या माध्यमातून मार्गदर्शनावर भर देण्यात येत आहे. याशिवाय विविध शाळांमध्ये मार्गदर्शक केंद्रे उभारण्यात येत असून हेल्पलाइनद्वारेही विद्यार्थ्यांना आवश्यक माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसोबत विविध कोटा अंतर्गत प्रवेशासाठी अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना गुणांच्या आधारे महाविद्यालयांची पसंती नोंदविता येणार आहे.