Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रात १,५०० डॉक्टरांची भरती; ट्रॉमा केअर सेंटर आणि रुग्णवाहिका सुविधांवर भर

राज्यभरात १५०० जागांसाठी डॉक्टरांची भरती करण्यात आहे. इतकेच नव्हे तर ट्रॉमा केअर सेंटर आणि रुग्णवाहिकांचा सुविधांवर भर देण्यात येणार आहे. याने आरोग्य विभाग अधिक सक्षम होण्याच्या दिशेने आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 23, 2025 | 02:40 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

राज्यातील आरोग्य सेवेला अधिक बळकट करण्यासाठी एप्रिल महिन्यात १,५०० डॉक्टरांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. यासंबंधी जाहिरात लवकरच प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत दिली. नुकतीच ४५० डॉक्टरांची भरती करण्यात आली असून, ग्रामीण भागात आरोग्य सेवा सुधारण्यासाठी नव्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

टेक कंपन्यांमध्ये मोठी कर्मचारी कपात; हजारोंच्या नोकऱ्या धोक्यात

महाराष्ट्रातील महामार्ग, अपघातप्रवण क्षेत्र, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि समृद्धी महामार्ग येथे ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यासाठी व्यापक आराखडा तयार केला जाणार आहे. यामुळे अपघातग्रस्त रुग्णांना त्वरित वैद्यकीय सेवा मिळण्यास मदत होईल. सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी राज्य सरकार १०८ रुग्णवाहिकांचे नव्याने कंत्राट देणार आहे. याअंतर्गत १,८०० नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासंबंधी लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल.

महाराष्ट्र सरकारचा सार्वजनिक आरोग्य विभाग राज्यातील १३ कोटी नागरिकांच्या आरोग्य आणि कल्याणासाठी जबाबदार आहे. या विभागामार्फत प्राथमिक आणि दुय्यम आरोग्य सेवा पुरविल्या जातात. यामध्ये जिल्हा रुग्णालये, सामान्य रुग्णालये, महिला रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालये यांचा समावेश होतो. प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांद्वारे समुदाय पातळीवर आरोग्य सुविधा पुरवल्या जातात.

राज्यात विविध आरोग्य योजना आणि संस्था कार्यरत आहेत. त्यामध्ये काही योजना-विशिष्ट क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश होतो. यामध्ये आरोग्य सेवा आयुक्तालय आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान, राज्य आरोग्य हमी सोसायटी आणि कर्मचारी राज्य हमी सोसायटी, महाराष्ट्र वैद्यकीय वस्तूखरेदी प्राधिकरण तसेच महाराष्ट्र राज्य एड्स कंट्रोल सोसायटी आणि राज्य रक्त संक्रमण परिषद यांचा समावेश आहे.

ISRO JRF भरती २०२५: ज्युनिअर रिसर्च फेलो पदासाठी करा अर्ज

राज्यातील सार्वजनिक रुग्णालयांमधील स्वच्छतेवरही विशेष भर देण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र धोरण आखले जाणार असून, लवकरच त्यासंदर्भात आवश्यक पावले उचलली जातील. डॉक्टर भरती, ट्रॉमा केअर सेंटर, रुग्णवाहिका सेवा आणि सार्वजनिक रुग्णालयांमध्ये सुधारणा यांसारख्या योजनांमुळे महाराष्ट्रातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम आणि प्रभावी होण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Recruitment of 1500 doctors in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2025 | 02:40 PM

Topics:  

  • Doctor
  • Recruitment News

संबंधित बातम्या

राज्यात क्रीडा शिक्षकांची पदे येणार भरण्यात! भरतीसाठी शिक्षण विभागाने दिली मंजुरी
1

राज्यात क्रीडा शिक्षकांची पदे येणार भरण्यात! भरतीसाठी शिक्षण विभागाने दिली मंजुरी

शिक्षक भरतीला शासनाची मंजुरी! पालिका व जि. प. शाळांना मोठा दिलासा
2

शिक्षक भरतीला शासनाची मंजुरी! पालिका व जि. प. शाळांना मोठा दिलासा

सामान्यज्ञान स्पर्धेत ५०० विद्यार्थी सहभागी! पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली १०० गुणांची स्पर्धा
3

सामान्यज्ञान स्पर्धेत ५०० विद्यार्थी सहभागी! पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली १०० गुणांची स्पर्धा

सुकाणू समितीची स्थापना; शिक्षकभरतीची जबाबदारी राज्य परीक्षा परिषदेकडेच
4

सुकाणू समितीची स्थापना; शिक्षकभरतीची जबाबदारी राज्य परीक्षा परिषदेकडेच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.