
CET परीक्षेबाबत महत्वाची बातमी! विद्यार्थ्यांना प्रथमच मिळणार....; कधी होणार परीक्षा?
२४ मार्च ते १६ मे या कालावधीत होणार सीईटी
विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेसाठी दोन प्रवेश पत्र
प्रवेश परीक्षांचे अंतिम वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध
पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षेतर्फे घेण्यात येणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पदवीपूर्व आणि पदव्युत्तर १७ व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) दिनांक २४ मार्च ते १६ मे या कालावधीत घेण्यात येणार आहेत. यावर्षी प्रथमच सीईटी कक्ष विद्यार्थ्याला प्रवेश परीक्षेची एक अस्थायी आणि एक अंतिम अशी दोन प्रवेश पत्रे देणार आहे.
सीईटी कक्षाने प्रवेश परीक्षांचे अंतिम वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. यानंतर त्या त्या प्रवेश परीक्षेच्या ८ ते १० दिवस आधी अस्थायी प्रवेशपत्र विद्यार्थ्याच्या लॉग-इनमध्ये ऑनलाइन उपलब्ध होतील. या अस्थायी प्रवेशपत्रामध्ये प्रवेश परीक्षेसाठी कोणता जिल्हा, शहर आले आहे, हे समजू शकेल. परीक्षा केंद्र भरताना पसंतीक्रमानुसार त्याला चार जिल्हे भरावे लागतात.
परीक्षा केंद्राची माहिती अंतिम प्रवेशपत्रात
विद्यार्थ्याला प्रवेश परीक्षेच्या तीन ते चार दिवस आधी अंतिम प्रवेशपत्र त्याच्या लॉग-इनमध्ये उपलब्ध करून दिले जाईल. या अंतिम प्रवेशपत्रात प्रत्यक्ष परीक्षा केंद्र, परीक्षा केंद्राचा कोड, परीक्षा केंद्राचे नाव आणि पत्ता याची माहिती दिली जाईल.
सीईटी परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी सुधारित नियमावली जाहीर; कॉपी केल्यास…
एमपीएड, एमएड अन् एम.एचएमसीटीचे अस्थायी प्रवेशपत्रे उपलब्ध
सध्या एमपीएड, एमएड आणि एम.एचएमसीटीचे या तीन अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेची अस्थायी प्रवेशपत्रे विद्यार्थ्याच्या लॉग-इनमध्ये ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहेत. यातील एमपीएड या अभ्यासक्रमाची परीक्षा दि. २४ मार्च तर एमएडची परीक्षा दि. २५ मार्च पासून सुरु होत आहे आणि एम.एचएमसीटीची परीक्षा दि. २५ मार्च पासून सुरु होत आहे.
सीईटी परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी सुधारित नियमावली जाहीर; कॉपी केल्यास…
गैरप्रकार रोखण्यासाठी सुधारित नियमावली जाहीर
राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या २०२६ च्या सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) नोंदणीची मुदत संपत आली असून, आतापर्यंत १२ लाख ९२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यंदा प्रथमच तीन अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी दोन संधी देण्यात आल्यामुळे सुमारे १७ लाख ३९ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेदरम्यान होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने सुधारित नियमावली जाहीर केली आहे.