Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० देशाच्या भविष्यासाठी पूरक! मंत्री चंद्रकांत पाटलांची भूमिका

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मुळे सक्षम, सृजनशील आणि ज्ञानसमृद्ध भारत घडेल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 17, 2026 | 06:55 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे सक्षम, सृजनशील आणि ज्ञानसमृद्ध भारत घडविण्याचे भक्कम पायाभूत धोरण असून, या धोरणामुळे विद्यार्थ्यांना नवोपक्रम, संशोधन आणि उद्योजकतेची प्रेरणा मिळणार आहे. त्यातून देशाच्या सर्वांगीण प्रगतीत विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग वाढेल, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ फोर्ट येथील सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार डॉ. अजय कुमार सूद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) रविंद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांच्यासह अधिसभा, व्यवस्थापन परिषद व विद्यापरिषदेचे सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राचार्य, विभागप्रमुख आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जवळा बाजार जि.प. शाळेत शिक्षकाची जागा रिक्त; ४ वर्गांसाठी ३ शिक्षक, पंचायत समितीत भरली विद्यार्थ्यांची शाळा

चंद्रकांत पाटील म्हणाले, मुंबई विद्यापीठ हे देशातील नवशिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे अग्रगण्य विद्यापीठ असून न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या थोर विभूतींनी येथे शिक्षण घेतले आहे. या महान व्यक्तींच्या विचारांचा वारसा पुढे नेत नवस्नातकांनी देशाच्या विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

२१व्या शतकात ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठे परिवर्तन होत असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांनी ‘कसे शिकायचे’ हे शिकण्यावर भर द्यावा, असे नमूद केले. राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे शिक्षण अधिक अनुभवात्मक, समावेशक आणि आनंददायी होईल. विज्ञानासोबतच कला, क्रीडा, संस्कृती आणि मूल्यशिक्षणाचा समावेश झाल्याने सर्वांगीण विद्यार्थी घडतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू असून, शिक्षकांना सक्षम करणे आणि शिक्षण क्षेत्रात सर्वोत्तम बुद्धिमान व्यक्तींना आकर्षित करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, प्रमुख पाहुणे डॉ. अजय कुमार सूद यांनी कुतूहल, सर्जनशीलता आणि नवोपक्रम हेच देशाच्या प्रगतीचे आधारस्तंभ असल्याचे सांगितले. शिक्षण पद्धतीत कुतूहल-केंद्रित अध्यापन, संकल्पनात्मक समज आणि प्रत्यक्ष प्रयोगाधारित शिक्षण आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ (ONOS) उपक्रमामुळे देशातील लाखो विद्यार्थी जागतिक दर्जाच्या संशोधनापर्यंत पोहोचू शकतील, असेही त्यांनी सांगितले.

Washim News: कलागुणांना प्रदर्शित करण्याची संधी! प्रत्येक शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम आवश्यक

या दीक्षान्त समारंभात पदवी व पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांतील एकूण १ लाख ७२ हजार ५२२ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. यामध्ये ८४ हजार ३१८ मुले आणि ८८ हजार २०२ मुलींचा समावेश आहे. तसेच ६०२ विद्यार्थ्यांना पी.एचडी पदवी प्रदान करण्यात आली. विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या १९ विद्यार्थ्यांना २१ पदके प्रदान करण्यात आली.

दीक्षान्त समारंभानंतर विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे, गुणपत्रिका व क्रेडिट्स डिजिलॉकरवर उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया विद्यापीठामार्फत सुरू करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली.

Web Title: The national education policy 2020 is beneficial for the countrys future

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 06:55 PM

Topics:  

  • Career
  • NEP

संबंधित बातम्या

Washim News: कलागुणांना प्रदर्शित करण्याची संधी! प्रत्येक शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम आवश्यक
1

Washim News: कलागुणांना प्रदर्शित करण्याची संधी! प्रत्येक शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम आवश्यक

जवळा बाजार जि.प. शाळेत शिक्षकाची जागा रिक्त; ४ वर्गांसाठी ३ शिक्षक, पंचायत समितीत भरली विद्यार्थ्यांची शाळा
2

जवळा बाजार जि.प. शाळेत शिक्षकाची जागा रिक्त; ४ वर्गांसाठी ३ शिक्षक, पंचायत समितीत भरली विद्यार्थ्यांची शाळा

भारतीय वायू दलात नोकरीची संधी! IAF कडून जाहीर करण्यात आली अधिसूचना; अग्निवीर भरती
3

भारतीय वायू दलात नोकरीची संधी! IAF कडून जाहीर करण्यात आली अधिसूचना; अग्निवीर भरती

Amaravati News : विद्यार्थ्यांना मोबाइलपासून दूर ठेवणे गरजेचे… भविष्यासाठी नीता मुंधडा यांचे आवाहन
4

Amaravati News : विद्यार्थ्यांना मोबाइलपासून दूर ठेवणे गरजेचे… भविष्यासाठी नीता मुंधडा यांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.