उल्लास नव भारत साक्षरता' योजनेची FLNAT परीक्षा पुढे ढकलली
यासंदर्भात शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय (योजना) तथा सदस्य सचिव, राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे, कृष्णकुमार पाटील यांनी १६ सप्टेंबर रोजी सर्व जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकारी (योजना) तसेच मुंवईच्या शिक्षणाधिकारी (योजना) यांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. दरम्यान, एफएलएनएटी परीक्षेची सुधारित तारीख व वेळ अद्याप निश्चित झालेली नाही.
पूर्वतयारी तात्पुरती स्थगित ठेवण्याचे निर्देश एफएलएनफ्टी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर परीक्षा केंद्र निश्चिती, परीक्षार्थीची नोंदणी व यादी तयार करणे भौतिक व प्रशासकीय व्यवस्था तसेच संबंचित यंत्रणांशी समन्यय करण्याची पूर्वतयारी करण्यात आली होती. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने ही पूर्वतयारी तात्पुरती स्थगित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
परीक्षार्थी, स्वयंसेवक, शिक्षक, मुख्याध्यापक, परीक्षा केंद्राशी संबंधित अधिकारी-कर्मचारी आणि इतर संबंधित घटकांना परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे परीक्षेबाबत कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारच्या ‘उल्लास – नव भारत साक्षरता कार्यक्रमा’अंतर्गत (ULLAS – New India Literacy Programme) १५ वर्षे व त्याहून अधिक वयोगटातील असाक्षर नागरिकांसाठी ‘पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी’ (FLNAT) आयोजित करण्यात येते. निरक्षरतेचे प्रमाण कमी करून मूलभूत साक्षरतेचा प्रसार करणे हा या परीक्षेचा मुख्य उद्देश आहे.
Raj Thackeray on UPI : युपीआय शुल्कावर राज ठाकरे संतापले; ‘डिजिटल सापळा’ म्हणत केंद्रावर केला
ही चाचणी प्रामुख्याने १५ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या असाक्षर व्यक्तींसाठी घेतली जाते.
FLNAT परीक्षा एकूण १५० गुणांची असते, ज्यामध्ये वाचन, लेखन आणि संख्याज्ञान (गणित) या तीन मूलभूत विषयांची विभागणी केलेली असते.
या उपक्रमाद्वारे केवळ अक्षर ओळखच नव्हे, तर डिजिटल साक्षरता, आर्थिक व्यवहारज्ञान, कायदेविषयक माहिती, आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापनाचे धडेही दिले जातात.






