Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सेवारत शिक्षकांसाठी नवे निकष कशाला? शिक्षक संघटनांचा सवाल; शिक्षक पात्रतापूर्ण नाहीत काय ?

राज्यातील विद्यार्थ्यांचे शिक्षण पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता वाढली आहे. शिक्षकांच्या आंदोलनाची झळ विद्यार्थ्यांना बसत आहे. राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनानंतर पालक, विद्यार्थी आणि शिक्षकवर्गामध्ये गोंधळ निर्माण झाला

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 08, 2025 | 12:03 PM
सेवारत शिक्षकांसाठी नवे निकष कशाला? शिक्षक संघटनांचा सवाल; शिक्षक पात्रतापूर्ण नाहीत काय ?

सेवारत शिक्षकांसाठी नवे निकष कशाला? शिक्षक संघटनांचा सवाल; शिक्षक पात्रतापूर्ण नाहीत काय ?

Follow Us
Close
Follow Us:
  • सेवारत शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करावी
  • शिक्षक भरतीसाठी वापरण्यात येणारे निकष
  • शिक्षक पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता परिपूर्ण
गडचिरोली : राज्यातील शिक्षण पात्रता परीक्षा (TET) विरोधात थेट शिक्षण राज्यमंत्र्‍यांपर्यंत पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्याने नाराज झालेल्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने राज्य सरकारला घेरण्यासाठी आता मोठा निर्णय घेतला आहे.

याचदरम्यान, राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेवरून बरेच वादळ उठले आहे. सेवारत शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करावी, अशी अट घालण्यात आली आहे. यामुळे यापूर्वी शिक्षक भरतीसाठी वापरण्यात येणारे निकष, शिक्षक पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता परिपूर्ण नाही काय? असा प्रश्न शिक्षक संघटनांकडून उपस्थित केला जात आहे. परिस्थितीनुसार भरतीचे निकष बदलले असले, तरी पूर्वी सेवेत समाविष्ट झालेल्या शिक्षकांना नवीन निकष कशासाठी, असा प्रश्न शिक्षक संघटनांकडून उपस्थित केला जात आहे. बदलत्या काळानुसार शिक्षकांना विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून अद्ययावत करण्याचे काम केले जात आहे. जिल्ह्यात १९९० ते २००० च्या दशकात शिक्षणसेवेत समाविष्ट झालेल्या शिक्षकांना संगणकाचे ज्ञान नव्हते.

२०१३ पूर्वीच्या शिक्षकांना टीईटीतून सूट द्या! शिक्षक सभेची राज्य शासनाकडे ठाम मागणी

मात्र, बदलत्या काळानुसार शिक्षकांनी संगणकाचे ज्ञान अवगत करून घेतले आहे. अनेक शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापनाचे कार्य करीत आहेत. दरम्यानच्या काळात शिक्षण आयुक्तांनी जिल्ह्यातील शाळा डिजीटल करण्याचा प्रयत्न चालविला होता. एवढेच नव्हे तर भामरागडसारख्या आदिवासीबहुल, नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील तालुक्यातील शाळा डिजीटल करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न यशस्वीरीत्या काही दिवस राबविण्यात आला. असे असतानाही शासनाने नवीन शिक्षक भरतीसाठी लावलेले निकष यापूर्वी सेवेत दाखल असलेल्या शिक्षकांना का, असाही प्रश्न शिक्षक संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.

आधुनिक तंत्रज्ञानानुसार अनेक शिक्षक अद्यावत राहण्याचा प्रयत्न करतात. हे खरे असले तरी विशिष्ट परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी अभ्यास करणे कठीण जाते. विद्यार्थ्यांना नवनवीन कोणते ज्ञान द्यायचे, याची कारणमीमांसा शिक्षक करीत असतात. त्यामुळे शासनाने नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापनासाठी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करीत आहेत. असे असतानाही नव्याने लावण्यात येणाऱ्या निकषाची पूर्तता करण्याची सक्ती केली जात आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासह आता शिक्षकांनाही ज्ञानार्जन करण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे.

शिक्षकांच्या आंदोलनाची झळ विद्यार्थ्यांना

राज्यात सध्या शिक्षक पात्रता परीक्षेवरून (टीईटी) वादळ उठले आहे. यामुळे राज्यातील काही शिक्षक संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. याचा परिणाम विद्याच्यर्थ्यांच्या ज्ञानार्जनावर होणार असल्याची खंत पालकांकडून व्यक्त केली जात आहे. तत्कालीन काळात शिक्षक भरतीसाठी वापरण्यात आलेले निकष हे सदोष होते काय? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कारंजा तालुक्यात शाळा बंद आंदोलन; ३४० शिक्षकांचा सहभाग, वेतनकपातीच्या इशाऱ्याने संताप

Web Title: Why new criteria for serving teachers question from teacher associations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 12:03 PM

Topics:  

  • maharashtra
  • TET

संबंधित बातम्या

Maharashtra Weather : धुक्याची चादर अन् गारठ्याचा जोर वाढला! ‘या’ जिल्ह्यात तापमान 6.6 अंशावर, तुमच्या भागात काय परिस्थिती?
1

Maharashtra Weather : धुक्याची चादर अन् गारठ्याचा जोर वाढला! ‘या’ जिल्ह्यात तापमान 6.6 अंशावर, तुमच्या भागात काय परिस्थिती?

समाजाच्या गरजा समजून घेतल्याशिवाय उद्योजकता शक्य नाही; एमकेसीएलचे संस्थापक विवेक सावंत यांचे मत
2

समाजाच्या गरजा समजून घेतल्याशिवाय उद्योजकता शक्य नाही; एमकेसीएलचे संस्थापक विवेक सावंत यांचे मत

२०१३ पूर्वीच्या शिक्षकांना टीईटीतून सूट द्या! शिक्षक सभेची राज्य शासनाकडे ठाम मागणी
3

२०१३ पूर्वीच्या शिक्षकांना टीईटीतून सूट द्या! शिक्षक सभेची राज्य शासनाकडे ठाम मागणी

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान? ‘शाळा बंद’ आंदोलनामुळे राज्यातील तब्बल ८० हजार शाळांना कुलूप
4

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान? ‘शाळा बंद’ आंदोलनामुळे राज्यातील तब्बल ८० हजार शाळांना कुलूप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.