
कारल्याची भाजी बनवल्याने मुलाने आईसोबत घातला वाद; रागातच केली हत्या
मूल : आईने कारल्याची भाजी बनवल्याच्या कारणाने आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ही घटना मूल तालुक्यातील डोंगरगांव येथे गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. सुमित्राबाई दशरथ पेटकुले (वय ६५) असे मृत पावलेल्या महिलेचे तर जगदीश दशरथ पेटकुले (वय ३८) असे आरोपी मुलाचे नाव आहे.
मूल तालुक्यातील डोंगरगांव येथील सुमित्रा दशरथ पेटकुले या मुलगा जगदीशसोबत मिळून राहत होते. यादरम्यानच जगदीशने आईची हत्या केली. याबाबतची माहिती पोलिस पाटील यांना दिली. त्यांनी मूल पोलिस स्टेशनला माहिती देताच पोलिस पथक डोंगरगांव येथे जावून पंचनामा केला. सुमित्राबाईचे शव उत्तरीय तपासणीसाठी मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. पती नेहमी मद्यप्राशन करून पत्नीला शिवीगाळ व मारहाण करत असल्याने ती मुलांना घेऊन माहेरी निघून गेली होती. त्यामुळे आई-मुलगा मिळून राहत होते.
दरम्यान, गुरुवारी रात्री आईने कारल्याची भाजी बनवल्याने जगदीशचा पारा चढला आणि आईशी वाद घालून मारहाण केली. या मारहाणीत आईचा मृत्यू आणि सकाळी उठल्या नाही. त्यामुळे घराशेजारी महिलांनी घरी जाऊन बघितले असता त्या मृतावस्थेत दिसून आल्या. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
आरोपीला मूल पोलिसांनी केली अटक
शवविच्छेदन झाल्यानंतर शव कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. आरोपीला मूल पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मूल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुबोध वंजारी करीत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हेदेखील वाचा : Chhatrapati Sambhajinagar Crime: ‘लोक काय म्हणतील?’ भीतीतून आईनेच 20 वर्षीय मुलीची केली हत्या; काय प्रकरण नेमकं?