
crime (फोटो सौजन्य: social media)
एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आधी पोटच्या तिन्ही मुलांची गळफास घेऊन हत्या केली त्यांनतर स्वतः डिझेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना बागलकोट जिल्ह्यातील बदामी तालुक्यातील हिरेमुचलगुड्डू गावात रविवारी दुपारी १ च्या सुमारास उघडकीस आली. मात्र आत्महत्या करणाऱ्या महिलेने असं का केलं, त्यामागचे कारण काय? याचा तपास पोलीस करत आहे.
काय घडलं नेमकं?
आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव रूपा हणमंत गौडर असे आहे. तर तीनही मृतकाचे नाव समृद्धी (५ वर्षे), प्रीतम (४ वर्षे) आणि सुक्षित (२ वर्षे) अशी आहे. रविवारी सकाळी १० दुपारी १ वाजताच्या सुमारास कोणीही नसल्याची संधी साधून रूपाने रागाच्या भरात आधी तिन्ही मुलांना गळफास लावला आणि त्यानंतर स्वतः डिझेल पिऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला.
त्यांनतर दुपारी १ वाजताच्या सुमारास हणमंत घरी परतलातेव्हा त्याला घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. त्याने बराच वेळ हाक मारली मात्र आतून काही प्रतिसाद मिळाला नाही, त्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला. आत गेल्यावर तिन्ही मुले मृतावस्थेत आढळली, तर रूपा बेशुद्ध पडलेली होती. तिला तातडीने बागलकोट येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
पोलीस तपस सुरु
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “कौटुंबिक कलह आणि पती हणमंत व सासू रेणव्वा यांच्या छळाला कंटाळून रूपाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय आहे. रूपा सध्या बेशुद्ध आहे. ती शुद्धीवर आल्यानंतर तिचा जबाब नोंदवला जाणार. त्यांनतर पुढील कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलीली नाही आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Ans: बागलकोट जिल्ह्यातील बदामी तालुक्यातील हिरेमुचलगुड्डू गावात.
Ans: समृद्धी (५), प्रीतम (४) आणि सुक्षित (२) वर्षे.
Ans: कौटुंबिक कलह आणि छळाला कंटाळून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.