
कानपूरमधील एअरफोर्समध्ये कामाला असणारे अनुराग शुक्ल यांच्या मेहुणीने जिजुंनी छेडछाड केल्याचा आरोप केला. तिच्या या आरोपामुळे अनुराग शुक्लला तब्बल 7 वर्ष कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या. 2019 मध्ये अनुराग यांचं लग्न झाल्य़ानंतर काही दिवसांनी ते सासरी गेले. त्यावेळी त्यांची मेहुणी त्यांच्याबरोबर कानपूरला आली होती. 8 मार्च 2019 च्या रात्री तिने अचानक ओरडायला सुरुवात केली. तिच्या म्हणण्यानुसार तिच्या जिजुंनी तिला पकडून छडण्याचा प्रयत्न केला. कुटुंबाने देखील लगेच फोन करुन पोलीसांना बोलावलं. त्यानंतत FIR दाखल झाली आणि अनुराग यांना अटक करण्यात आलं. त्यांना 19 दिवस तुरुंगात रहावं लागलं. पण या प्रकरणात एक ट्विस्ट होता. कोर्टात मेहुणीने स्वत:चं स्टेटमेंट दिलं आणि सगळी गणितं बदलली.
कोर्टात केस दाखल झाली आणि प्रत्येक सुनावणीच्या वेळेस पुराव्यांअभावी अनुराग दोषी ठरत नव्हते. सुनावणी दरम्यान त्यांच्या 15 वर्षीय मेहुणीने सांगितलं की, तिने त्या रात्री अँटीबायोटीक गोळ्या घेतल्या होत्या. तेव्हा ती अर्धवट झोपेत होती. तेव्हा तिला स्वप्नं पडलं की, बहिणीच्या नवऱ्याने तिच्यावर बळजबरी केली. आणि म्हणून ती ओरडली. तिला स्वप्नं खरं वाटलं आणि कुटुंबियांनी देखील तिच्यावर विश्वास ठेवून जावयाची तक्रार केली.
तब्बल 7 वर्षानंतर या प्रकणात अनुराग यांची निर्दोष मुक्तता कोर्टाने केली. तब्बल 7 वर्ष अनुराग यांना न केलेल्या गुन्ह्यासाठी नव्हे तर न झालेल्या गुन्ह्यासाठी कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या. या सगळ्यात अनुराग यांनी नोकरी गेली. त्यांना मानसिक त्रास झाला. समाजात बदनामी झाली. या एका स्वप्नामुळे अनुराग यांना विनाकारण अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलं.