
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इंडियन ऑइलने आपल्या ग्राहकांना स्पष्टपणे कळवले आहे की, जर त्यांनी १६ ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर त्यांना एलपीजी सिलिंडर मिळणार नाहीत. कंपनीने ग्राहकांना त्यांचे ई-केवायसी वेळेवर पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. याचा अर्थ असा नाही की त्यांचे कनेक्शन रद्द केले जाईल; ते फक्त एलपीजी सिलिंडर बुक करू शकणार नाहीत किंवा मिळवू शकणार नाहीत. एकदा पडताळणी पूर्ण झाल्यावर, ग्राहकांना पुन्हा एलपीजी सिलिंडर मिळू शकतील.
ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, ग्राहकांनी इंडेन, एचपी किंवा भारत गॅसचे अधिकृत ॲप डाउनलोड करावे. ॲपमध्ये, फेस स्कॅन प्रक्रिया सुरू करु शकतो. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर स्थिती तपासण्याचे लक्षात ठेवा.
ग्राहक त्यांच्या गॅस एजन्सीला भेट देऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. येथे बायोमेट्रिक्सचा वापर केला जाईल. कृपया लक्षात घ्या की, तुमच्याकडे नेहमी असलेला तुमचा मोबाईल नंबर तुम्ही नोंदणी करणे आवश्यक आहे, कारण यामुळे बुकिंग प्रक्रिया पूर्ण होईल.
सरकारने एलपीजी सिलेंडर बुकिंगच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आता ओटीपीशिवाय एलपीजी सिलेंडर वितरित केले जाणार नाहीत. गॅस सिलेंडर फक्त नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरूनच बुक केले जातील. ग्रामीण भागात एलपीजी सिलेंडरसाठी बुकिंग ४५ दिवसांनंतर, तर शहरी भागात २५ दिवसांनंतर स्वीकारले जाईल.