मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील पिंजर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घडली आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवा गावात नागोराव गांवडे हा व्यक्ती राहतो. त्याला दोन मुलं आहेत. मृत मुलगा संदीप हा पुण्यातील एका कंपनीत काम करतो तर दुसरा मुलगा गावातच काम करतो. संदिपचं गावातीलच एका दलित मुलीवर प्रेम होतं. त्यांने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र संदीपच्या कुटुंबियांना त्याचा हा निर्णय मान्य नव्हता. त्याच्या वडिलांचा या लग्नाला विरोध होता. यावरुन बापलेकामध्ये नेहमी वाद होत होते. संदीपच्या वडिलांच्या विरोधामुळे या दोघांनी पळवून जाऊन लग्न करण्याचं ठरवलं. ही गोष्ट संदीपच्या वडिलांना समजली आणि त्यांनी दुसऱ्या मुलाच्या मदतीनं संदीपची हत्या केली.
मृत संदिप ऐकत नसल्याने वडिल खूप संतापले होते. घटनेच्या दिवशीही बापलेकामध्ये पुन्हा वाद झाला. यावेळी तो त्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे त्याने सांगतिले. दरम्यान, आधिच संतपलेल्या वडिलांने दुसर मुलग आणि इतर साथीदाराच्या साहाय्याने संदीपची हत्या केली. मुलाची हत्या करून झाल्यानंतर वडील आणि मारेकरी भाऊ हे सर्व बाहेरगावी निघून गेले होते, त्यानंतर शुक्रवारी ते गावात परतल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून पुढील तपास सुरू आहे.






