
crime (फोटो सौजन्य: social media)
Navi Mumbai Crime: वॉर्डबॉय ‘डॉक्टर’ बनून केला उपचार, चुकीच्या इंजेक्शनमुळे 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू
काय घडलं नेमकं?
घडलेली घटना बिहारच्या सारम जिल्ह्यातील आहे. खुशबूचे वडील हिरालाल शर्मा हे व्यवसायाने प्लंबर आहे. तर तिच्या आईचे वर्षभरापूर्वी आजारपणामुळे निधन झाले होते. तेव्हापासून घराची मोठी जबाबदारी खुशबूच्या खांद्यावर आली होती. घटनेच्यावेळी खुशबूचे वडील कामासाठी शेजारील गावात गेले होते. घरात लहान मुले खेळत असताना शेजाऱ्यांना खुशबूच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी तातडीने धाव घेतली. तिने गळफास घेत आत्महत्या केली. शेजारच्यांनी तिला खाली उतरवले. मात्र तो पर्यंत उशीर झाला होता. तिची मृत्यू झाली होती.
आत्महत्येचा कारण काय?
आत्महत्येच्या एका दिवसापूर्वी तिचा मोबाईल फोडण्यात आला होता आणि तिला रागावले देखील होते. याच रागातून किंवा घरगुती मानसिक तणावातून तिने टोकाचा पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मुलीचा मृतदेह पाहताच वडिलांनी एकच टाहो फोडला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.
पोलिसांनी काय दिली माहिती
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टम साठी रुग्णालयात पाठवला आहे. ‘मुलीच्या गळ्यावर खुणा आढळल्या आहेत, मात्र आत्महत्येचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल’, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
Pune Crime : पुण्यात तरुणावर कोयत्याने सपासप वार; पोलिसांनी गुन्हेगाराला सापळा रचून पकडले
Ans: बिहार राज्यातील सारम जिल्ह्यात ही घटना घडली.
Ans: तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच तिने हे टोकाचं पाऊल उचललं.
Ans: आईच्या मृत्यूनंतरचा मानसिक ताण आणि मोबाईल फोडल्यामुळे झालेला राग हे संभाव्य कारण मानले जात आहे.