
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
अक्षय रामभाऊ शिनगारे (वय 25) आणि नवरी मुलगी अक्षया सुनील चव्हाण (वय 23) अशी अपघातात मृत्यू झालेल्या वधू-वरांची नावे आहेत. गेल्या रविवारी म्हणजेच १५ फेब्रुवारी रोजी मांजरसुंबा येथील कन्हैया मंगल कार्यालयात त्यांचा साखरपुडा पार पडला होता. अक्षया चव्हाण हिची लातूर येथे महापरोषणाची परीक्षा असल्याने ती रविवारी पहाटे वाशी येथून Nexon (क्र. MH 25 BF 5064) ही कार घेऊन निघाली होती. कारमध्ये अक्षय रामभाऊ शिनगारे आणि चालक अक्षय यादव सिरसट (वय 22) हे दोघे होते.
रत्नापूर पाटीजवळील धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भारधाव कार थेट येडशी टोल नाका येथील कमानीवर आदळली. धडक इतकी भीषण होती की, वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला. या अपघातात अक्षय आणि अक्षया यांचा जागीच मृ्त्यू झाला, तर चालक गंभीरपणे जखमी झाला.
या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक, पोलीस आणि महामार्ग सुरक्षा पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी झालेल्या चालकाला १०८ रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह येरमाळा येथील प्राथमिक आरोग्या केंद्रात शवविच्छेदन कारण्यासाठी पाठवला आहे. या घटनेने दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
६.९५ लाखांच्या निधीची अफरातफर; दोन अभियंत्यांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथील ग्रामपंचायतीच्या विकासकामांमध्ये तब्बल ६ लाख ९५ हजार ३६५ रुपयांच्या निधीची अफरातफर झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात धाराशिव जिल्हा परिषदेचे एक कनिष्ठ अभियंता, एक उपअभियंत्यासह अन्य एकाचा समावेश आहे. यातील उपअभियंता हे मयत आहेत. तरीही गुन्हा नोंद झाल्याने खळबळ उडाली आहे.
HSC Exam: नागपूरात बारावी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; कोचिंग क्लास चालक व विद्यार्थी अटकेत
Ans: धोकादायक वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटून कार टोल नाका कमानीवर आदळली.
Ans: चालक गंभीर जखमी असून उपचार सुरू आहेत.
Ans: पंचनामा करून तपास सुरू; अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.