Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘शेतात जाऊन येतो…’ म्हटलेला शेतकरी परतलाच नाही; विष प्राशन करून संपवलं जीवन

राजकुमार यांच्या नावावर केवळ अर्धा एकर शेती असून, त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. उत्पन्नाचे ठोस साधन नसल्याने कर्जाची परतफेड करणे कठीण झाले होते. परिणामी, ते गेल्या पंधरवड्यापासून प्रचंड विवंचनेत वावरत होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 14, 2026 | 05:31 PM
कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

Follow Us
Follow Us:

लाखनी : बचतगट तसेच खासगी सावकारी कर्जाच्या वाढत्या ओझ्यामुळे तणावातून अल्पभूधारक शेतकऱ्याने शेतात विष प्राशन करून जीवन संपविल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लाखनी तालुक्यातील मांगली-बांध येथे तान्हा येथे घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.

राजकुमार मारोती बारसागडे (वय ५२, रा. मांगली-बांध) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. राजकुमार यांच्या नावावर केवळ अर्धा एकर शेती असून, त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. उत्पन्नाचे ठोस साधन नसल्याने कर्जाची परतफेड करणे कठीण झाले होते. परिणामी, ते गेल्या पंधरवड्यापासून प्रचंड विवंचनेत वावरत होते. शुक्रवारी तान्हा पोळ्याच्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे ते ‘शेतात जाऊन येतो’ असे सांगून घराबाहेर पडले. बराच वेळ उलटूनही ते घरी परत न आल्याने त्यांचा मुलगा अनमोल हा शेतावर गेला. तेथे राजकुमार हे शेतात बेशुद्धावस्थेत पडलेले दिसले. त्यांना तत्काळ पालांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

केवळ 8 महिन्यात तब्बल 102 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या; नापिकी, आर्थिक संकट ठरलं मुख्य कारण

दरम्यान, प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

अकोला तालुक्यात सर्वाधिक शेतकऱ्यांची आत्महत्या

कर्जबाजारीपणा, नापिकी, वाढता लागवड खर्च आणि उत्पन्नातील तफावत यांसारख्या विविध कारणांमुळे शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. अकोला जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट 2026 या आठ महिन्यात तब्बल 105 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यापैकी 48 प्रकरणे शासनाच्या आर्थिक मदतीस पात्र ठरली असून, 34 प्रकरणे अपात्र ठरली आहेत. तर 23 प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, यासाठी महाराष्ट्र शासनाकडून पात्र वारसांना एक लाख रुपयांची मदत दिली जाते. यासाठी जिल्हास्तरीय समितीमार्फत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे प्रस्ताव तपासले जातात. समितीच्या बैठकीत शासनाच्या निकषांनुसार, प्रत्येक प्रकरणाची छाननी करून पात्रता निश्चित केली जाते. पात्र ठरलेल्या कुटुंबांना त्यानंतर शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते.

धक्कादायक ! दररोज 28 शेतकरी करत आहेत आत्महत्या; सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात, NCRB चा रिपोर्ट समोर

Web Title: Farmer ends life by consuming poison

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 05:31 PM

Topics:  

  • Farmer Issue
  • Farmer Suicide
  • Suicide case

संबंधित बातम्या

अकोला तालुक्यात सर्वाधिक शेतकऱ्यांची आत्महत्या; केवळ 48 कुटुंबाला मिळणार शासनाची मदत
1

अकोला तालुक्यात सर्वाधिक शेतकऱ्यांची आत्महत्या; केवळ 48 कुटुंबाला मिळणार शासनाची मदत

केवळ 8 महिन्यात तब्बल 102 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या; नापिकी, आर्थिक संकट ठरलं मुख्य कारण
2

केवळ 8 महिन्यात तब्बल 102 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या; नापिकी, आर्थिक संकट ठरलं मुख्य कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.