काय घडलं नेमकं?
देवाजी आडकू धकाते (६५, रा. ताडूरवारनगर, आरमोरी) या प्रकरणातील हत्या झालेल्या वडिलांचे नाव आहे. तर आरोपी मुलाचे नाव योगेश देवाजी धकाते (२५) असे आहे. धकाते कुटुंबाची पालोरा गावाजवळ वीटभट्टी असून तेथे ते दोघे पिता पुत्र दिवसभर काम करायचे. पाच मुलीस योगेशच्या जन्म झाला होता. पाचही मुलींचे विवाह झालेले असून योगेशचाही वर्षभरापूर्वी विवाह लावून दिला होता. योगेश लग्नानंतर आई-वडिलांसोबतच एकत्रित राहत होता. त्याची पत्नी गर्भवती होती, त्यातच वडील किरकोळ कारणावरुन रागावत असत, शिवाय गर्भवती असूनही तिला काम सांगायचे, ही बाब योगेशला खटकत होती. यातून पिता-पुत्रात खटके उडत. वडिलांना अद्दल घडविण्यासाठी त्याने त्यांच्या हत्येचा कट रचला.
दोघे पिता- पुत्र अंधार पडल्यावर वीटभट्टीवरुन रोज घरी येत होते. १२ एप्रिल रोजी त्याने वडिलांच्या आधीच घराचा रस्ता धरला. सायंकाळी साडेसात वाजता वडील घराकडे पायी परतत होते. पालोरा गावाजवळच्या बोगद्यानजीक वडील पोहोचताच तेथे आधीच दबा धरून बसलेल्या योगेशने त्यांच्यावर पाठीमागून कुऱ्हाडीने वार केले. यावेळी वडील मुलगी निकिताशी फोनवरुन बोलत होते, हल्ल्यानंतर मेलो रे… म्हणत ते जोरात ओरडले. मुलीचे काळीज हेलावले. मात्र, तिच्यासाठी पित्यासोबतचा हा संवाद शेवटचा ठरला. तिने तातडीने शेजाऱ्यांना फोन करुन माहिती दिली.
पित्याला शोधण्याचे नाटक आणि…
वडिलांना संपवून रक्ताने माखलेल्या कुऱ्हाडीसह योगेशने घर गाठले. पाण्याने कुऱ्हाड धुतली. आई कमलबाई, चुलतभाऊ रुपेशसोबत वडिलांना शोधण्याचे त्याने नाटक केले. अखेर बोगद्याजवळ वडिलांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला. पोलिस निरीक्षक कैलास गवते यांनी घटनास्थळ गाठले. मात्र, यावेळी योगेशच्या हालचाली संशयास्पद होत्या. त्यामुळे संशयाची पहिली सुई त्याच्या दिशेने वळली आणि अखेर चौकशीत त्याने सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
Ans: कौटुंबिक वाद आणि सततच्या भांडणातून हत्या झाली.
Ans: ते मुलीशी फोनवर बोलत होते.
Ans: संशयास्पद हालचालींमुळे चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला.






