
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
विमल प्रजापती असं या कुटुंबातील प्रमुखांचा नाव आहे. १ एप्रिलच्या रात्री विमल यांनी घराजवळ असलेल्या आयओसी रोडवरील एका डेअरीतून डोसा बनवण्यासाठी तयार पीठ विकत आणलं होतं. घरात आनंदाने डोसे बनवण्यात आले आणि कुटुंबाने ते आवडीने खाल्ले. दुसऱ्या दिवशी सकाळी उरलेल्या पिठाचे पुन्हा डोसे बनवून खाण्यात आले, पण त्यानंतर काही वेळातच तब्येतीवर परिणाम झाला.
कांदा व्यापाऱ्याने केली महिलेची फसवणूक; आधी विश्वास संपादन केला अन् नंतर 30 लाखांना गंडा घातला
काही तासांतच होत्याच नव्हतं
डोसा खाल्ल्यानंतर काही वेळातच कुटुंबातील सर्वांना उलट्या आणि मळमळीचा त्रास सुरू झाला. त्रास इतका वाढला की, विमल, त्यांची पत्नी भावना आणि त्यांच्या दोन मुलींना तातडीने रुग्णालयात दाखल करावं लागलं. दुर्दैवाने ३ महिन्यांच्या लहान मुलीचा उपचार सुरु असतांना ४ एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्यांनतर ५ एप्रिल रोजी त्यांच्या ४ वर्षांच्या दुसऱ्या मुलीचा करून अंत झाला. सध्या मुलींच्या आई- वडिलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
तपासणी सुरु
या घटनेनंतर पोलिसांनी ज्या डेअरीतून हे पीठ विकत घेतलं होतं, तिथले नमुने ताब्यात घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोन्ही मुलींच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. या अहवालातूनच विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
डेअरी मालकाने केला दावा
ज्या डेअरीतून मालक केतन भाई यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या दिवशी त्यांनी 100 किलोपेक्षा जास्त पिठाची विक्री केली होती. त्यांनी इतर ग्राहकांशी संपर्क साधला असता, कोणालाही असा त्रास झाल्याची तक्रार आलेली नाही. त्यामुळे हा त्रास पिठामुळेच झाला की घरात वापरलेल्या इतर कोणत्या पदार्थामुळे, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
Haryana Crime: 20 वर्षांची सेवा, शेवटी रक्तरंजित अंत! नोकराने मालकाची गळा चिरून केली हत्या
Ans: अहमदाबादच्या चांदखेडा परिसरात.
Ans: अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय.
Ans: अन्न नमुने तपासणीसाठी पाठवून चौकशी सुरू केली.