
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
सोहना-बल्लभगढ रोडवर असलेल्या हरचंदपूर बसस्थानकाजवळील एका फार्म हाऊसमध्ये घडली आहे. ६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी पोलिसांना माहिती मिळाली की फार्महाऊसमध्ये एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. पोलिसांना घटनास्थळी धाव घेतल्यांनंतर मृताची ओळख राहून (36 वर्षे) अशी पटली, जो मूळचा गुरुग्रामच्या घाटा गावचा रहिवासी होता. राहुल ५ एप्रिलच्या रात्री फार्म हाऊसवर मुक्कामाला गेला होता. सकाळी जेव्हा त्याचा मृतदेह आढळला, तेव्हा तिथे काम करणारा नोकर खेमचंद बेपत्ता होता आणि त्याचा फोनही बंद येत होता. यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तातडीने नोकर खेमचंदचा तपास सुरु करून त्याला अटक केली. आरोपी हा मूळचा प्रदेशातील बुलंदशहरचा रहिवासी आहे.
Hingoli Crime : हिंगोलीत धक्कादायक प्रकार! बनावट रेल्वे पोलीस बनून पोलिसांनाच लुटणारी टोळी जेरबंद
हत्येमागचं कारण काय?
पोलिसांनी केलेल्या चौकशीत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. खेमचंद हा गेल्या २० वर्षांपासून राहुलच्या कुटुंबाकडे नोकरी करत होता. साधारण 1.5 वर्षांपूर्वी त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला होता, त्यामुळे त्याने काम सोडले होते, परंतु अवघ्या 2 महिन्यांपूर्वीच तो पुन्हा कामावर परतला होता. खेमचंदने कबुली दिली की, राहुल त्याला लहान-सहान गोष्टींवरून शिवीगाळ करायचा आणि मारहाण करायचा. या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने हत्येचा कट रचला. 5 एप्रिलच्या रात्री जेव्हा राहुल गाढ झोपेत होता, तेव्हा खेमचंदने तिथेच असलेला धारदार विळा उचलला आणि राहुलच्या गळ्यावर सपासप वार केले, ज्यामध्ये राहुलचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी आरोपीला दिल्लीतून अटक
पोलिसांनी आरोपीला दिल्लीतून अटक केली आहे. हत्येनंतर आरोपी पकडले जाण्याच्या भीतीने दिल्लीला पळून गेला होता, मात्र पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि गुप्तहेरांच्या मदतीने त्याला अटक केली. आरोपीविरुद्ध हत्या गुन्हा दाखल कारण्याता आला असून त्याला न्यालयात हजर करण्याची प्रकिया सुरु आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
शितल पेट्रोल पंपाजवळील अपघातप्रकरणी मोठी अपडेट; टँकर चालकाबाबत पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती
Ans: जुन्या वाद आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी.
Ans: 20 वर्षांपासून काम करणारा नोकर.
Ans: 24 तासांत आरोपीला दिल्लीतून अटक केली.