नेमकं काय घडलं?
मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव कालू (२३) असे आहे. तर संजू, राहुल आणि विशाल या तीन आरोपींना अटक केली आहे. संजू हा या संपूर्ण कटाचा मास्टरमाइंड आहे. होळीच्या दिशी कालूने प्रेयसीला रंग लावला होता, ज्याचा राग संजूच्या मनात होता. याच रागातून त्याने कालूचा काटा काढण्याचे ठरवले. घटनेच्या दिवशी संध्याकाळी संजूने कालूला घराबाहेर बोलावले आणि तिघेही दारू पिण्यासाठी गेले. आरोपींची स्वतः कमी प्यायली आणि कालूला जास्त पाजली. तो पूर्णपणे नशेत झाल्यांनतर आरोपींनी त्याला रेल्वे रुळाजवळ नेले. तेथे संजूने कालूच्या गळ्यावर स्क्रू ड्रायव्हरने वार केले. तरीही तो मेला नाही, तेव्हा आरोपींनी त्याला जिवंत अवस्थेत रेल्वे रुळाला बांधले. नशेत असल्याने कालू स्वतःचा बचाव करू शकला नाही. काही वेळातच अंगावरून ट्रेन गेल्याने त्याचे तुकडे झाले.
Pune Crime : पुण्यात पोलिस चौकीत शिपायाला धक्काबुक्की; नेमकं काय घडलं?
कसा लावला शोध
सुरुवातीला हा अपघात किंवा आत्महत्या असावी असा संशय होता. मात्र, कालूच्या मोबाईल लोकेशनचा डेटा आणि आरोपींच्या संशयास्पद हालचालींवरून पोलिसांना संशय आला. कडक चौकशी केल्यानंतर तिन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला. सुरुवातीच्या तपासात ही एक दुर्घटना असल्याचे मानले जात होते, मात्र त्यानंतर जीआरपी (GRP) ने केलेल्या तपासात हा खून असल्याचे उघड झाले.
दोघांमध्ये होते जुने वाद
जीआरपीचे पोलीस अधिकारी धर्मपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांमध्ये जुने वाद देखील होते. कालूने एकदा संजूची दुचाकी घेतली होती, जिचा अपघात झाला होता. या अपघाताचे पैसे कालूने संजूला दिले नव्हते, त्यावरूनही त्यांच्यात वाद सुरू होता.
शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
Ans: हरियाणातील पाणीपत येथे ही घटना घडली.
Ans: प्रेयसीला होळीचा रंग लावल्याच्या वादातून ही हत्या करण्यात आली.
Ans: त्यांनी तरुणाला नशेत रुळाला बांधून ट्रेनखाली दिलं.






