नणंदेचं 'ते' प्रकरण उघड केलं म्हणून नवरा संतापला; बायकोच्या भुवयांवरून ट्रिमरच फिरवला
मायणी : कलेढोण (तालुका खटाव) येथील मंगल संतोष जाधव या महिलेचा पती संतोष सखाराम जाधव यांनी गळा आवळून खून केल्याची घटना घडली. या खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष सखाराम जाधव (मूळ गाव नरसिंगपूर, तालुका वाळवा) येथील आहे.
सध्या तो आपली पत्नी सुमन उर्फ मंगल संतोष जाधव हिच्यासह आपली सासरवाडी कलेढोण येथे वास्तव्यास आहे. मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. संतोष हा नेहमीच आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. त्यामुळे वारंवार त्यांच्यात खटके उडत होते. मंगलचा भाऊ प्रशांत माने व त्याची पत्नी उषा नेहमीच या दोघांना समजावून सांगून यांचे भांडण मिटवत होते. बुधवारी (दि. १९) रोजी रात्री नऊच्या सुमारास संतोष आणि मंगल यांच्यात वादावादी सुरू होती.
मंगलचा भाऊ व वहिनी यांनी दोघात समेट घडवून आणला होता. परंतु, रागाच्या भरात संतोषने सुमन उर्फ मंगलचा गळा आवळून खून करून तिथून पलायन केले. खूनामागचे कारण अद्यापही अस्पष्ट असून लवकरात लवकर खुनाचे कारण हे स्पष्ट होईल, असे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत पाटील यांच्यासह प्रवीण सानप, अमोल चव्हाण, अजित काळेल यांच्या टीमने संतोषला इस्लामपूरमधून अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत पाटील पुढील तपास करत आहेत.
दरवाजा उघडा दिसल्याने प्रकार उघड
नेहमीप्रमाणे प्रशांत व त्याची पत्नी दोघेही पहाटे साडेपाचच्या दरम्यान मॉर्निंग वॉकला निघाले असता मंगलच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी आत जाऊन पाहिले तर मंगल निपचित पडलेली त्यांना दिसली. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता मंगलचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मायणी पोलिसांना कळवले.