Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat Crime News : कुर्बानीकरीता400 ते 500 गोमातांचा देणार होते बळी; गोरक्षकांनी उधळला कट

नेरळ जवळील दामत गावात बकरी ईदचे दिवशी 500 गोवंश हत्या होणार असल्याची माहिती मिळाली होती.गोरक्षकांनी पोलीसांच्या मदतीने अ‍ॅक्शनमोडवर शोधकार्य सुरु केलं असून हत्येचा कट उधळला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jun 08, 2025 | 04:47 PM
Karjat Crime News : कुर्बानीकरीता400 ते 500 गोमातांचा देणार होते बळी; गोरक्षकांनी उधळला कट
Follow Us
Close
Follow Us:

कर्जत/ संतोष पेरणे : नेरळ जवळील दामत गावात बकरी ईदचे दिवशी 500 गोवंश हत्या होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे गोरक्षकांनी पोलीसांच्या मदतीने अ‍ॅक्शनमोडवर शोधकार्य सुरु केलं. मात्र दामत गावातील प्रत्येक घरातील गोवंश यांची तपासणी केली असता केवळ 17 गोवंश यांना टॅगिंग नव्हते आणि त्यामुळे त्या सर्व 17 गोवंश यांची गोशाळेत रवानगी करण्यात आली.बकरी ईदच्या दिवशी दामत गावात कोणत्याही गोवंश ची हत्या होणार नाही म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता.दरम्यान, नेरळ पोलिस आणि अतिरिक्त कुमक यांचे रायगड चे पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी नेरळ येथे येऊन कौतुक केले.

कर्जत तालुक्यातील दामत या मुस्लिम बहुल गावात 500 गोवंश यांची कत्तल बकरी ईद चे दिवशी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करीत रायगड जिल्हा पोलिस प्रमुख यांच्याकडून अतिरिक्त पोलिस फाटा नेरळ येथे पाठवण्यात आला होता.त्यावेळी गोरक्षक प्रतीक ननावरे आणि अन्य 40/50 यांच्या मागणीनुसार 4 जून रोजी दामत गावात आगामी बकरी ईद सणाच्या अनुषंगाने कुर्बानीकरीता 400/500 गोवंशीय जनावरे आहेत.

या आगोदर दामात येथील सर्व गोवंशीय जनावरांना पशुवैद्यकीय अधिकारी डॉ बागुल यांचे माध्यमातून आरोग्य तपासणी आणि टॅग करून घेण्यात आले.त्यांनंतर पोलीसांनी दोन दिवस दामत गावात सर्च ऑपरेशन राबविले असता त्यामध्ये 17गोवंशीय जनावरे बिना टॅगचे आढळून आल्याने संबंधीतावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा नोंद करण्यात आला.परंतु तरी देखील गोरक्षक प्रतिक ननावरे याचे समाधान न झाल्याने तो त्याचे सहकारी यांचेसोबत नेरळ पोलीस ठाणे येथे धरणे आंदोलन करण्यास बसले.सदरवेळी नेरळ येथील बजरंग दलाचे ॲड दिपक गायकवाड तसेच स्थानिक गोरक्षक प्रज्ञेश खेडेकर, अमोल सुर्यवंशी,ओमकार भडसावळे हे नेरळ पोलिस ठाणे येथे पोहचले.त्यावेळी स्थानिक गोरक्षक यांनी प्रतीक ननावरे आणि अन्य यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र स्थानिक गोरक्षक यांचे म्हणणे न ऐकता प्रतिक ननावरे आणि त्यांचे सहकारी यांनी टिवले हॉटेल समोर कर्जत बदलापूर कल्याण राज्यमार्ग अडवण्याचा प्रयत्न सुरू केला.तेथील नाका येथे वाहने अडविल्याने तेथे वाहतुकीस अडथळा निर्माण होवून वाहतुकीच कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे पोलीसांनी सदर बेकायदेशीर जमावावर सौम्य लाठीचार्ज केला आणि संबंधित तिघांवर नेरळ पोलिस ठाणे येथे गुन्हे दाखल केले आणि रात्री सोडून दिले.त्यांनतर काल साजरी झालेली बकरी ईद चे दिवशी मुस्लिम बहुल गावामध्ये मोठ्या उत्सवात ईद साजरी झाली.

रायगड जिल्हा पोलिस अधिकारी आँचल दलाल यांच्याकडून पोलिसांना सर्वाधिकार दिल्याने आणि पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या माध्यमातून नेरळ जवळील दामत तसेच कळंब आणि कळंब परिसरातील साळोख तसेच चिकनपाडा येथे गो हत्या होणार नाही याची काळजी घेतली.संपूर्ण दिवसभर गोवंश हत्या झाली नसल्याचा दावा पोलिसांनी केला असून पोलिसांच्या सतर्क भूमिकेमुळे नेरळ परिसरात होणारा दंगलीचा प्रकार रोखला गेला आहे.

दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी रात्री साडेनऊ वाजता नेरळ पोलिस ठाणे येथे येऊन नेरळ पोलिसांशी चर्चा केली आणि पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी केलेले नियोजन यांचे कौतुक केले.सद्यस्थिती नेरळ परिसरात शांतता असून रायगड जिल्हयाचा नव्याने पदभार स्विकारलेल्या, पोलीस अधीक्षक दलाल यांनी दामत तसेच इतर गावात गोवंशीय जनावरांची अवैध कत्तल करणा-या इसमांविरूध्द कडक स्वरूपाची कारवाई करण्याच्या सुचना प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांना दिलेल्या आहेत.

 



Web Title: Karjat news 400 to 500 cows were to be sacrificed for qurbani cow guards foiled the plot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2025 | 04:47 PM

Topics:  

  • crime news
  • karjat news
  • Raigad News

संबंधित बातम्या

35 हजारांची लाच घेणं भोवलं; पौड पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराला रंगेहात पकडले
1

35 हजारांची लाच घेणं भोवलं; पौड पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराला रंगेहात पकडले

Ahilyanagar Crime: अल्पवयीन मुलीचे अपहरण अन् मग जंगलात नेऊन लैंगिक अत्याचार! प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’चे स्वरूप
2

Ahilyanagar Crime: अल्पवयीन मुलीचे अपहरण अन् मग जंगलात नेऊन लैंगिक अत्याचार! प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’चे स्वरूप

खून का बदला खून! दुहेरी हत्याकांडातील आरोपीची कुरकुंभजवळ हत्या; परिसरात तणावाचे वातावरण
3

खून का बदला खून! दुहेरी हत्याकांडातील आरोपीची कुरकुंभजवळ हत्या; परिसरात तणावाचे वातावरण

IT के चक्कर मैं मत पडना! नोकरीचे आमिष दिले अन् उमेदवारांकडून थेट…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
4

IT के चक्कर मैं मत पडना! नोकरीचे आमिष दिले अन् उमेदवारांकडून थेट…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.