
crime (फोटो सौजन्य: social media)
मी केतनला सांगितलं होतं….
चौकशीदरम्यान सियाने असा दावा केला की, तिने केतनला, तिच्या आणि चेतनमधील प्रेमसंबंधांबद्दल सांगितलं होतं. मला हे लग्न करायचे नाहीये आणि पळून जायचे आहे, असे सियाने केतनला सांगितलं होतं. मात्र, केतन हे लग्न रद्द करण्यास तयार नव्हता. केतनने तिला सांगितलं की आता हे लग्न रद्द होऊ शकत नाही आणि माझं कुटुंब इतके श्रीमंत आहे की तू कुठेही गेलीस तरी तुला शोधून काढू, असं केतन म्हणाल्याचा दाव सियाने केला. (Ketan Agarwal Murder Case)
चेतनसोबतच्या नात्याला कुटुंबाचा नकार
हे लग्न करण्यासाठी माझ्यावर कुटुंबाचा प्रचंड दबाव होता, असं सियाने पोलिसांना सांगितलं. केतनची कौटुंबिक पार्श्वभूमी चांगली आणि संपन्न आहे, तसेच त्याच्याशी लग्न केल्यास तिचं भविष्य सुरक्षित होईल, असे सियाच्या कुटुंबीयांना वाटत होतं. याउलट, चेतनची आर्थिक स्थिती फार चांगली नसल्याने ते त्याच्यासोबतच्या तिच्या नात्याच्या विरोधात होते. (Ketan Agarwal Murder Case)
अंमली पदार्थांचे व्यसन
सिया आणि चेतन या दोघांनाही अंमली पदार्थांचे किंवा नशिल्या गोष्टींचे व्यसन होते. पोलीस कोठडीत असताना दोघांनीही मद्यपान केल्याची कबुली दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सियाने बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर शाळा सोडली होती. चेतनचे काका नरेश यांनी सांगितले की, सियाच्या काही सवयींमुळे तिचे आई-वडील चिंतेत होते आणि लवकरात लवकर तिचे लग्न लावून तिचे आयुष्य स्थिरावण्याचा त्यांचा विचार होता. (Ketan Agarwal Murder Case)
माफीचा साक्षिदार कोण?
मुख्य आरोपी चेतन चौधरीच्या दुकानात काम करणाऱ्या नीरज कुमारने पोलिसांना सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. आता यामुळे सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तपासात नीरजच्या मोबाईलचा वापर कसा करण्यात आला, चेतनने आपले लोकेशन लपवण्यासाठी कोणता डाव आखला आणि लोहगडावरील घटनाक्रम काय होता, याबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. (Ketan Agarwal Murder Case)
धक्कादायक ! व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक करून तब्बल 98.50 लाखांची फसवणूक; ‘तो’ मेसेज आला अन्…
Ans: पुण्यातील लोहगड किल्ल्यावर ही घटना घडली.
Ans: सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.
Ans: तिने केतनसोबत लग्न करायचे नसल्याचे सांगितले होते, असा दावा तपासातून समोर आला आहे.