
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
काय नेमकं प्रकरण?
23 नोव्हेंबर 2023 रोजी एका खाजगी आरामबसने (ट्रॅव्हल्स) विराट गौतम आणि त्यांचा कुटुंब पुण्याच्या दिशेने परत प्रवास करत होते. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही आरामबस कोल्हापूर जवळील पुईखडी घाटात आली असता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस भीषणपणे पलटी झाली. या अपघातात नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले, तर तिघांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातामध्ये जखमी झालेल्या विराट गौतम यांच्या डोळ्यांसमोर त्यांची पत्नी नीला, मुलगी रसिका आणि मुलगा शर्विल यांचा मृत्यू झाला. या अत्यंत भीषण आणि काळीज पिळवटून टाकणाऱ्या प्रसंगाने विराट गौतम यांना जबर मानसिक धक्का बसला. कुटुंबाचा अंत्यविधी आटोपून विराट गौतम पुण्यातील आपल्या घरी परत गेले, मात्र त्यांना सातत्याने आपल्या संपूर्ण कुटुंबाची आठवण छळत होती.
विराट गौतम हे पुईखडी घाटातील त्याच अपघातस्थळी जायचे जिथे त्यांच्या पत्नी, मुलगा आणि मुलगी यांची मृत्यू झाली होती. तिथे बसून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून द्यायचे. ते दरवेळी अपघातस्थळावर आपल्या पत्नी आणि मुलांच्या स्मरणार्थ तीन हजार अर्पण करून निघून जायचे. यावर्षी १० मे रोजी विराट गौतम हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी गेले. त्यांनतर सलग दोन दिवस ते पुईखडी घाटातील अपघातस्थळावर अत्यंत नैराश्याच्या अवस्थेत बसलेले स्थानिक नागरिकांना दिसून आले होते, मात्र त्यानंतर ते अचानक तिथून गायब झाले.
प्रचंड दुर्गंधी आणि…
पुईखडी घाटाच्या या परिसरात प्रचंड प्रमाणात दुर्गंधी सुटल्याने स्थानिक नागरिकांनी आजूबाजूला शोध घेण्यास सुरुवात केली. नागरिकांनी शोध घेतल्यावर तिथे एका व्यक्तीचा बेवारस मृतदेह अत्यंत सडलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृताच्या कपड्यांची आणि त्याच्याजवळ असलेल्या बॅगेची कसून तपासणी केली. या तपासणी दरम्यान पोलिसांना मृतदेहाजवळ एक मोबाईल फोन आणि ओळखपत्र सापडले. या ओळखपत्रावरील आणि साहित्यावरील माहितीवरून तो मृतदेह दुसरा कोणाचा नसून पुणे येथील विराट गौतम यांचाच असल्याचे स्पष्ट झाले.
विषारी औषध पियुन संपवले जीवन
पोलिसांनी विराट गौतम यांनी त्याच अपघातस्थळी विषारी औषध पिऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्या ठिकाणी अडीच वर्षांपूर्वी त्यांच्या हसत्याखेळत्या कुटुंबाचा अंत झाला, त्याच ठिकाणी त्यांनीही आपल्या आयुष्याचा शेवट केला. या घटनेने कोल्हापूर आणि पुणे परिसरात हळहळ व्यक्त केला जात आहे.
पाटणात रिक्षाचालकाची निर्घृण हत्या; शवाचे 3 तुकडे करुन रेल्वे ट्रॅकवर फेकले, शीर अजूनही बेपत्ता
Ans: गोव्याहून परतताना झालेल्या बस अपघातात त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाला होता.
Ans: ते कोल्हापूरजवळील पुईखडी घाटातील अपघातस्थळी जात होते.
Ans: कुटुंबाच्या विरहातून नैराश्यात जाऊन विराट गौतम यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.