
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
साहिल जाकीर काझी (वय २९) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर आरोपीचे नाव राजू लक्ष्मण कांबळे (वय 30) असे आहे. पोलिसांनी याला अटक केली आहे. आरोपी राजू कांबळे आणि साहिल काजी यांच्यात गाडीच्या कर्जाचे हप्ते भरण्यावरून जुना वाद होता. यातच सोशल मीडियावरील ग्रुप वर काही कमेंट्स केल्या होत्या. त्यातून त्यांच्यात वाद झाला. आरोपी राजू कांबळे यांनी साहिल आणि त्याचा मित्र कार्तिक कलकुटगी याला चर्चेसाठी बोलावले होते.
Dharashiv Crime: धाराशिवात बोअरवेलच्या वादातून रक्तरंजित हल्ला; सख्ख्या भावानेच घेतला भावाचा जीव
चर्चेसाठी आणि वाद मिटवण्यासाठी जयसिंगपूर येथील पोस्ट कार्यालयाच्या मागील बाजूच्या रस्त्यावर ते आले होते. मात्र हा वाद कमी पुणे ऐवजी वाढतच गेला. राजूने चाकू काढून साहिलच्या छातीवर आणि दंडावर वार केले. त्यानंतर तू तिथून पसार झाला. गंभीर जखमी अवस्थेत साहिलला उपचारासाठी रुग्णालयात देण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आरोपीच्या शोधासाठी पथक पाठवून त्याला अटक केली. पोलीस सोशल मीडियावरील ग्रुप वर नेमक्या कोणत्या कमेंट झाल्या? तसेच हा ग्रुप कोणत्या कारणासाठी वापरला जातो याचा तपास करत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडालेली आहे.
17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून पळवलं नंतर…; धक्कदायक प्रकार उघड
कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आला आहे. एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचा आमिष दाखवून पळून नेलं आणि तिचं लैंगिक शोषण केलं. यामुळे अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केल्या असून या घटनेने परिसरात खळबळ उडालेली आहे. घडलेली घटना कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
Ratnagiri Crime: कोयत्याने तरुणाची निर्घृण हत्या; अखेरच्या क्षणी सांगितली आरोपींची नावे
Ans: साहिल झाकीर काझी असे मृत तरुणाचे नाव होते.
Ans: कोल्हापुरातील जयसिंगपूर येथे घटना घडली.
Ans: पोलिसांनी आरोपी राजू लक्ष्मण कांबळेला अटक केली.