
crime (फोटो सौजन्य: social media)
Dharashiv News : येरमाळा यात्रेत मंगळसूत्र चोरी करणाऱ्या तिघांना अटक; 1.31 लाखांचा मुद्देमाल जप्त
काय घडलं नेमकं?
गुरुवारी नागपूरच्या गिट्टीखदान परिसरातून अथर्व नैनोरे हा १४ वर्षीय मुलगा बेपत्ता झाला होता. गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या शोभायात्रेत तो शेवटचा दिसला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते, मात्र आता दोन दिवसानंतर शनिवार दिनांक ४ एप्रिल रोजी कळमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरतवाडा परिसरात रिंगरोडलगत आढळून आला आहे.
अतिशय वाईट अवस्थेत सापडला मृतदेह
अथर्वचा मृतदेह एका पोत्यात आढळून आला. त्याचे हातपाय बांधलेल्या अवस्थेत होते, त्याचे डोळे, जीभ आणि चेहरा अत्यंत विकृत अवस्थेत होते. त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर अनेक घाव होते. त्याचा मृतदेह पाहून पोलीस देखील आश्चर्य व्यक्त करत होते. अथर्वचा मृतदेह ज्या पोत्यात सापडला त्या पोत्यांवरील ट्रेड मार्कवरुन आणि बॅच क्रमांक वरून आरोपीचा शोध घेत आहेत.
आम्ही त्याला घरी चलण्यास सांगितले परंतू…
शोभायात्रा मार्गावरील एका नर्सिग होम जवळील एका आईसक्रीम पार्लरच्या सीसीटीव्हीत अथर्व दोन मित्रांसोबत जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी या दोन मित्रांचा शोध घेऊन त्यांची विचारपूस केली असता त्यांनी “आम्ही त्याला घरी चलण्यास सांगितले परंतू त्याने नकार दिला,” असे उत्तर दिले.
पोलीस तपास सुरु
पोलिसांनी या प्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे. त्याची हत्या कोणी केली? का केली? अशे अनेक प्रश्न पोलिसांनी उपस्थित केले आहेत. जर अथर्वचे अपहरण करून हत्या करण्यात आली असेल तर मारेकरी त्याच्या ओळखीचे असू शकता. आरोपींना त्या भागाची इथ्थंभूत कल्पना असावी असे पोलिसांना वाटते. आरोपी हे मुख्य मार्गावरील CCTV मध्ये दिसू नये या पद्धतीने त्याला सीसीटीव्ही नसलेल्या गल्लीबोळ्यातून नेले असा पोलिसांना संशय आहे.
नरबळी की हत्या?
हत्या पैश्यांच्या वादातून झाली असावी, अशी दाट शंका पोलीस व्यक्त करत आहे. मात्र पौर्णिमेच्या दिवशी ही हत्या झाली असेल तर हत्येमागे नरबळीसारखे कारण असू शकते अशी देखील शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. अथर्वचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व पैलूने तपास करत आहे. या घटनेने अथर्वच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Dharashiv News: खाजगी शाळेतील विद्यार्थ्याला मारहाण प्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल
Ans: हनुमान जयंतीच्या दिवशी शोभायात्रेदरम्यान.
Ans: कळमेश्वर परिसरातील रिंगरोडलगत.
Ans: हत्या, ओळखीचे लोक आणि नरबळी या सर्व शक्यतांवर तपास सुरू आहे.